Buy 5 thousand quintals of gram of Nafed
Buy 5 thousand quintals of gram of Nafed 
मराठवाडा

नाफेडतर्फे पाच हजार क्‍विंटल हरभरा खरेदी ; गंगापूर, पैठण केंद्रावर सर्वाधिक आवक

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : तूरप्रमाणेच नाफेडतर्फे ऑनलाइन पद्धतीने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर आतापर्यंत 450 शेतकऱ्यांचा 4 हजार 978 क्‍विंटल हरभार खरेदी करण्यात आला आहे. हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

राज्यभरात नाफेडतर्फे 11 मार्चपासून हरभरा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद, खुलताबाद, कन्नड येथे हरभरा नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. 

आधी नोंदणी आणि त्यानंतर खरेदी अशी प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद कृषी विभागाअंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख 44 हजार 635 हेक्‍टर असून, यंदा 9 लाख 7 हजार 80 हेक्‍टरवर पेरणी झाली. 

यंदा अनेक जिल्ह्यात हरभऱ्यास एकरी चांगला उतारा मिळत असून आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 4 हजार 400 रुपये असताना खुल्या बाजारात मात्र तीन हजार 300 रूपये दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत सर्वाधिक हरभरा खरेदी गंगापूर केंद्रावर (2564 क्विंटल) तर सर्वात कमी वैजापूर केंद्रावर (4 क्विंटल) करण्यात आला. हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी करून आपला माल विक्री आणण्याचे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT