माहूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक मंगळवारी मुंबईत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 
मराठवाडा

लवकरच असा दिसेल माहूरगड...

बालाजी कोंडे

माहूर (जि. नांदेड) -  श्रीक्षेत्र माहूर हे देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. या ठिकाणी पर्यटन विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्मिती होणारे मोठे तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर व आळंदीच्या धर्तीवर श्रीक्षेत्र माहूर गडचा विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या.  

श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासंदर्भात विधानभवन मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. चार) आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंबईत घेतली आढावा बैठक

माहूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती देण्यासाठी मंगळवारी मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

या वेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता एस. व्ही. तोटावाड, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सहायक संचालक औरंगाबाद अजित खंदारे, माहूर येथील सहायक अभियंता वसंत झरीकर, कनिष्ठ अभियंता रवींद्र उमाळे यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

अकरा ठिकाणांचा समावेश

श्रीक्षेत्र माहूर गड विकास आराखडा यामध्ये श्री रेणुकामाता मंदिर, श्री दत्तशिखर, श्री. अनसूयामाता मंदिर यासह अकरा ठिकाणांचा समावेश आहे. त्यामध्ये धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

रोप वेच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत माहूर येथील पर्यटक सुविधा केंद्र इमारत ते श्री रेणुका देवी मंदिर, दत्त शिखर, अनसूया देवी मंदिरास जोडणाऱ्या रोप वेसाठी रेणुका देवी मंदिर येथे लिफ्टसह फूटओवर ब्रिज या कामासाठी निविदा स्तरावर काम सुरू आहे. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सादरीकरणाच्या माध्यमातून या वेळी माहिती देण्यात आली.

२१६ कोटी रुपयांची तरतूद

श्रीक्षेत्र माहूर गडासाठी २०१६ - १७ मध्ये २१६ कोटी रुपयांची तरतूद होती. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी लागणारी रक्कम दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने घेऊन हा आराखडा पूर्ण व्हावा, माहूर येथील विकास आराखडा तयार करीत असताना पुरातत्व विभागाने मंदिराचा विकास आराखडा तयार करून सादर करावा.

तसेच पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसार ही कामे करण्यात यावीत. माहूर येथे उत्सव काळात मंदिरामध्ये मोठी गर्दी होते. त्या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन त्या ठिकाणी एसी (वातानुकूलित यंत्रणा) बसविण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या वेळी दिले.

माहूरकडे दुर्लक्ष नको

राज्यातील इतर तीर्थक्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. माहूरकडे दुर्लक्ष झाले. कमीत कमी कालावधीत विभागनिहाय निधीचे नियोजन करून पुढील दोन वर्षांत आराखड्यातील अंतर्भूत असलेली सर्व कामे विभागनिहाय पूर्ण करण्यात यावी, जेणे करून येत्या काळात येथे येणाऱ्या सर्व भक्तांना या विकासाचा लाभ घेता येईल, अशा सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT