Horticulture
Horticulture 
मराठवाडा

दुष्काळाने फळबागा होताहेत बेचिराख

सकाळवृत्तसेवा

बीड - पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. दोन वर्षे सोडली तर त्याआधी सतत तीन वर्षे दुष्काळ जिल्ह्यात पडला होता. यामध्ये जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के फळबागा जळाल्या होत्या. यानंतर दोन वर्षे जिल्ह्यात चांगला पाऊस पडला. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना फळबागांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता; परंतु परत पडलेल्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील फळबागा बेचिराख होताना दिसत आहेत.

या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील ७० टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दोन वर्षांपासून जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांनी फळबागांसाठी लाखो रुपये खर्च करून शेततळे, तलावापासून पाइपलाइन यासह विविध साधनांची सोय केली होती. शेतकऱ्यांनी पपई, पेरू, आंबा, आवळा, मोसंबी, डाळिंबाची लागवड केली; परंतु यंदा दुष्काळामुळे गावोगावी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एवढा पैसा खर्च करून लावलेल्या फळबागा डोळ्यांसमोर जळत असताना येथील शेतकरी काहीच करू शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे यंदा पार कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील फळबागा जगविण्यासाठी प्रशासनाने काही तरी उपाययोजना राबविण्याची मागणी येथील शेतकरी करू लागले आहेत.

मजुराला संसाराचा गाडा चालविण्याची चिंता
धानोरा - अंबाजोगाई तालुक्‍यातील धानोरा खुर्द परिसरात दुष्काळी परिस्थितीने शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने शेतमजूर कामाच्या शोधात आहेत. रोजगार हमीची कामेही बंद असल्याने मजुरांच्या आर्थिक नाड्या बंद झाल्या आहेत. 

धानोरा परिसर मांजरा नदीकाठचा भाग आहे. या भागात बागायती शेती असल्याने मजुरांच्या हाताला बारमाही काम मिळत होते. या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपातील पीक न आल्याने मजुराला हाताला काम मिळाले नाही. 

रब्बी हंगामातही मजुरांचे खुरपणी काढणीचे काम बंद झाले. काही मजूर स्थलांतर करीत  आहेत. दुष्काळी परिस्थितीने मजुराला काम मिळत नसल्याने मजूरही आर्थिक संकटात सापडला आहे. 

रोजगार हमी योजना नावालाच 
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना शंभर दिवस काम द्यावे लागते; मात्र या रोजगार हमीचे काम बंद असल्याने मजुरांच्या हाताला काम नसल्याने ही योजना नावालाच राहिली आहे. सध्या तरी धानोरा परिसरात योजनेअंतर्गत कोणत्याही  मजुराला काम मिळाले नाही.

आम्हाला शेतात बारमाही काम मिळत होते. या वर्षी दुष्काळाने कामाविना हात आखडला आहे. शेतात काहीही नसल्याने हाताला काम मिळत नाही. आम्हाला काम मिळाले तरच प्रपंच चालणार आहे. शासनाने मजुराला काम द्यावे.
- दाऊद शेख, मजूर, धानोरा खुर्द, ता. अंबाजोगाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT