farmer
farmer 
मराठवाडा

मातीत राबणारे हात आता दगडात राबू लागलेत

सुशांत सांगवे

लातूर : खरंतर आम्ही शेतकरी. आमच्या नावावर स्वत:च अान्‌ कुटूंबाचं पोट भरंल इतकं एकरभर रान हाय. पण दुष्काळांमुळं रानात सध्या काय बी नाय. जिकडं बघावं तिकडं उजाड रान. थोडं पाणी असतं तर आम्ही माळवं (भाजीपाला) लावून पोट भरलं असतं बघा. पण पाण्याचा टिपूससुद्धा नाही. त्यामुळं पोटासाठी शहराचा रस्ता पकडावा लागला. मातीत राबणारे आम्ही. आता हातात हातोडा घेऊन दगडं फोडायची वेळ आलीय. दुष्काळ लई, लई वाईट असतोया... दुष्काळाचे चटके सहन करणारे काही शेतकरी आपल्या व्यथा मांडत होते.

गेल्या काही दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्याने ४१ अंशावर मुक्काम ठोकला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पंखे, कुलर असतानाही लोक घामाघुम होत आहेत. रस्त्यांवर तर शुकशुकाटच दिसत आहे; पण शहरातील एका रस्त्यावर भर उन्हात दगडफोडीचा आवाज घुमत होता. तेथील कामगारांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. तेंव्हा ते कामगार नसून शेतकरी असल्याचे समोर आले. रेणापूर तालुक्यातील सुमठाणा गावातील हे शेतकरी. प्रत्येकाच्या नावावर दोन-तीन एकर शेती आहे. पण दुष्काळांमुळं या शेतकऱ्यांना कामगार व्हावं लागलं आहे. दिवसभर रस्ता बांधणीची काम केल्यानंतर पुरूषांना ३२५ तर महिलांना २७५ रुपये मिळत आहेत.

कुटुंबासाठी शहराकडं यावं लागलं
शेतकरी बाबु येलंगफळे म्हणाले, ‘‘दोन मुलं, दोन मुली आणि आई असं आमचं कुटुंब. शेतात थोडं-फार पिकत होतं, तोवर कुटुंब चालत होतं. आता शेतात काय बी नाय. मग कुटुंब चालवायचं कसं? शहराकडं तर यावं लागणारच की. मी एकटाचं नाही आमच्या गावातली बरीच करती-धरती माणसं बाहेर पडलीयत, हाताला काम शोधत. आपल्याकडं तीन-चार वर्षांपूर्वी जितका भयंकर दुष्काळ होता, त्याहून अधिक भयंकर दुष्काळ यंदा पडला आहे. आम्ही तो सोसतोय. भोगतोय. शेतासाठी जाऊ द्या प्यायला पाणी नाही, अशी गत झालीय. मग लोक गावच्या बाहेर पडणारच की. जिकडं हाताला काम मिळंल तिकडं लोक जातायंत.’’

पोटासाठी दिवसभर ऊन खायची तयारी
हातात घमेली आणि खोऱ्या घेऊन ६५ वर्षाच्या आजीबाई रुक्मिणी भारती याही कुटुंबाचे पोट भरण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘पाणी नाही म्हणून तर लातुरात यावं लागलं. इथं काम शोधताना रस्त्याची कामं मिळाली. हातोडा घेऊन दगडं फोडणं, ती उचलणं असली कामं कधी केली नाही. पण आता ती करावी लागतायंत. दुष्काळानं वेळच तशी आणलीय. सुखासुखी कोण आसल्या उन्हात राबतयं व्हय? दिवसभर घाम गाळला तर तीनशेला २५ कमी, इतके पैसे मिळतात. कुटुंबाचं पोट भरायला तेवढे पुरत्यात. त्यासाठी या वयात दिवसभर ऊन खाण्याची तयारी आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT