dafli
dafli 
मराठवाडा

डफली आंदोलनाने दणाणला जिल्हाकचेरीचा परिसर, का आणि कुठे ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : कोरोनाने हातावर पोट असणाऱ्यांचे तर एक वेळची देखील चूल पेटने मुश्कील होऊन बसले आहे. गोरगरिबांचा अजिबात विचार न करता जिल्हाधिकारी जयवंशी यांनी १४ दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर डफली वाजवून आंदोलन केले. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही डफली वाजवत शासनाचा निषेध केला. शासनाविरुद्ध घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून सोडला होता. 

कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. प्रत्येकाची रोजमजुरीवर गुजरान सुरू असून करण्यात आलेल्या लॉकडाउनमूळे त्यांचा रोजगार हा थांबला आहे. तर फुटकळ व्यवसायिक देखील लॉकडाउनमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वास्तविक पाहता संचारबंदीचा काळ कमी करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यापूर्वी देखील गांधी चौक येथे हात गाड्यावर चपल व जोडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तरी देखील प्रशासनाने लॉकडाउनचा कालावधी कमी केलेला नाही. ही परिस्थिती एकट्या हिंगोली जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात केलेल्या लॉकडाउनमुळे प्रत्येक जण अडचणीत सापडलेले आहे.

पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा
अगोदर तीन महिने केलेल्या लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात भर आता या परत करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पडली आहे. त्यामुळेच ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन केले. हिंगोली येथील आंदोलनात रवी वाढे, वसिम देशमुख, ज्योतीपाल रणवीर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अन्यथा संचारबंदी मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वंचित आघाडीने दिला आहे.


औंढा नागनाथ येथे तहसीलदारांना निवेदन 
औंढा नागनाथ : भारिप बहुजन महासंघ व वंचित आघातर्फे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना बुधवारी (ता.१२) निवेदन देण्यात आले. भारिप व वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य शासनाला राज्यातील एसटी महामंडळ सेवा तत्काळ सुरु करा व लॉकडाउन बंद करा अशी मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीकडे केंद्र व राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी डफली बजाव आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्या होते. त्याप्रमाणे औंढा नागनाथ येथे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देऊन राज्यातील एसटी महामंडळ सेवा सुरु करा व लॉकडाउन बंद करा असे निवेदन दिले आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील एसटी महामंडळ सेवा सुरू करा राज्यातील लॉकडाउन बंद करा, कोरोना रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा द्या अशा मागण्या या निवेदनामध्ये आहेत. सदरील निवेदन हे औंढा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर भारिप व वंचित आघाडीचे बाळासाहेब साळवे, रामराव मुळे, अरविंद मुळे, सुनील मोरे, मुकुंद मस्के, राजू कांबळे, अक्षय वाहुळे कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT