मराठवाडा

जायकवाडी धरणाने ओलांडली ८० टक्के पाणीपातळी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - मराठवाड्यातील महत्वाचे असे जायकवाडी धरणाचे ८० टक्क्यांची पाणी पातळी ओलांडली आहे. आवक पाहता माजलगावकडे सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे. 

नाशिक आणि नगर भागात यंदा जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडीच्या वरची धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पाऊस झाल्यास वरच्या काठोकाठ भरलेल्या धरणातून विसर्ग करण्यात येतो आहे. ३१ हजार क्यूसेकने जायकवाडी धरणात शनिवार (ता. १०) पर्यंत सुरू असलेला ओघ रविवारी (ता.११) सकाळी 63 हजार क्यूसेकवर पोचला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत पुन्हा झपाट्याने वाढ व्हायला लागली आहे. शनिवारी रात्री दहाला ७७.१२ टक्के भरले असलेले जायकवाडी पुढील अकरा तासात ३.३५ टक्के वाढून ८०.४७ टक्क्यांवर पोचले आहे. आवक पाहता जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावकडे पाणी सोडण्यात येत आहे. सुमारे दोन दिवसांपासून सुरू असलेला हा प्रवाह ४०० क्यूसेक एवढा होता, तो आता ६०० क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. जायकवाडीत एकूण २४८५.१५ दश लक्ष घनमीटर एवढा जिवंत पाणीसाठा आहे. यंदा या धरणातून सुमारे २ महिने मृत साठ्यातून उपसा करावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT