मराठवाडा

औद्योगिक क्षेत्राला अभियंत्यांनी दिला आकार

सकाळ वृत्तसेवा

गंगापूर (जि.औरंगाबाद) : औद्योगिक क्षेत्रात बुद्धिवान, गुणवान, कौशल्यधारक अभियंत्यांना मोठा वाव आहे. आजही त्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आतापर्यंत अभियंत्यांनीच आपल्या बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या जोरावर औद्योगिक क्षेत्राला आकार दिला आहे. अभियंत्यांमुळेच या क्षेत्राचा विस्तार झाला आहे. तालुक्‍यात वाळूज एमआयडीसीत अनेकांनी रोजगार मिळवला आहे. अभियंत्यांना राज्यात पुणे येथेही वाव असल्याने तिकडेही अनेकजण धाव घेताना दिसतात. गुणवान, कौशल्याधारित अभियंत्यांची सदासर्वकाळ सर्वत्र गरज आहे.


पदवी घेण्यासोबतच मोठ्या पगाराच्या भ्रमात न राहता आपली क्षमता वाढवल्यास कोठेही हमखास नोकरी मिळते. अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांपैकी तीस टक्के विद्यार्थीच पुढे काम करण्याला पात्र असतात, असे जागतिक सर्वेक्षणात आढळून आले आहे. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर हा दिवस "जागतिक अभियंता दिन' म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने अभियांत्रिकीच्या शाखेतील प्राचार्य, विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद.


सध्याची इंडस्ट्रीजची गरज लक्षात घेऊन अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करावा लागेल. विद्यार्थ्यांनाही परीक्षेच्या चक्रातून बाहेर येऊन अधिकाधिक कौशल्य आत्मसात करावे लागेल. अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठी असूनही फक्त एक लाख अभियंते दरवर्षी बाहेर पडतात. तुलनेत भारतातून चौदा लाख अभियंते बाहेर पडतात.
- डॉ. उल्हास शिऊरकर (संचालक, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद)

भारतातील अभियंत्यांमध्ये गुणवत्ता आहे; पण अभियंता होणाऱ्यांची संख्या जगाच्या तुलनेत भारतात जास्त आहे. पदवी घेऊन लगेच बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही. विद्यार्थ्यांना त्यासाठी काही काळ विविध कंपन्यांमध्ये काम करून कौशल्य आत्मसात करावे लागते. विद्यार्थ्यांच्या पगाराच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. त्यांना लगेच अपेक्षित पगार मिळत नाही.
- योगेश धोत्रे (अभियंता)



जे विद्यार्थी पदवी घेऊन नुकतेच बाहेर पडणार आहेत, त्यांना उद्योगजगतात नोकरीची मोठी संधी आहे; पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी क्षमता वाढवायला हवी. नोकरीच्या ठिकाणी आत्मविश्‍वासाने वावरले पाहिजे. चांगल्या अभियंत्यांना भरपूर काम आहे. ज्यांची क्षमता नाही, ते फक्त नकारात्मक बोलत राहतात. काम करण्याची तयारी असलेल्यांना संधी आहे.
- अजय वाणी (अभियंता)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT