farmer write letter by blood to CM eknath Shinde 
मराठवाडा

शेतकऱ्याने रक्ताने लिहिले मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

मदतीपासून काही गावे वगळल्याची खंत

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : अतिवृष्टीच्या मदतीपासून काही महसूल मंडळे वगळल्याने ताकतोडा (ता. सेनगाव) येथील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून कैफियत मांडली आहे. अतिवृष्टी झाली नसल्याचे सांगत गोरेगाव, आजेगाव, बाभूळगाव, पुसेगाव (ता. सेनगाव) या मंडळातील शेतकऱ्यांना मदतीपासून वगळले आहे.

त्यामुळे नामदेव पतंगे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अतिवृष्टीसह विविध कारणांनी शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच मदतीपासून वगळल्यामुळे चार मंडळांतील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा प्रश्न ते विचारत आहेत. खासगी फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांना नाकीनाऊ आणीत असून जगायचे कसे ते सांगा, असा प्रश्न या पत्रात उपस्थित केला आहे. सेनगावच्या तहसील कार्यालयामार्फत हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

SCROLL FOR NEXT