farmer write letter by blood to CM eknath Shinde 
मराठवाडा

शेतकऱ्याने रक्ताने लिहिले मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

मदतीपासून काही गावे वगळल्याची खंत

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : अतिवृष्टीच्या मदतीपासून काही महसूल मंडळे वगळल्याने ताकतोडा (ता. सेनगाव) येथील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून कैफियत मांडली आहे. अतिवृष्टी झाली नसल्याचे सांगत गोरेगाव, आजेगाव, बाभूळगाव, पुसेगाव (ता. सेनगाव) या मंडळातील शेतकऱ्यांना मदतीपासून वगळले आहे.

त्यामुळे नामदेव पतंगे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अतिवृष्टीसह विविध कारणांनी शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच मदतीपासून वगळल्यामुळे चार मंडळांतील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा प्रश्न ते विचारत आहेत. खासगी फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांना नाकीनाऊ आणीत असून जगायचे कसे ते सांगा, असा प्रश्न या पत्रात उपस्थित केला आहे. सेनगावच्या तहसील कार्यालयामार्फत हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT