मराठवाडा

खळबळजनक ! महाराष्ट्रात पोहोचला Bird Flu, मुरूंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच

गणेश पांडे

परभणी, ता. 11  :  मुरुंबा (ता. परभणी) येथे 800 कोंबडयाचा अचानक मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या मृत पावलेल्या कोंबड्या चा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यू  'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यु झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल रविवारी (ता. 11)  रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात 'बर्ड फ्लू' मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

गावात उपाययोजना करण्यात येत आहेत. एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असून गावातील दहा किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. मुरूंबा (ता.परभणी) गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात पशूसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. 

havoc of bird flu in maharashtra more than 800 chicken died due to bird flu in parabhani

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Commission Report : दबावाखाली अर्ज माघारी? पुण्यातील बिनविरोध निवडणुकांवर आयोगाचा रिपोर्ट कार्ड

माझ्यावर ७० हजार कोटींचे आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत, भ्रष्टाचारावर अजित पवारांचं विधान

Video Viral: पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा थरार! पोलीस पांगवण्यासाठी आल्यावर थेट राष्ट्रगीत म्हटलं, शेवटी MPSC वाले म्हणतात

Vishwas Patil : ‘शासन आणि प्रशासन हेच मायमराठीचे खऱ्या अर्थाने ‘घरचे मारेकरी’ आहेत.

India vs New Zealand 2026 ODI Squad : ३ खेळाडूंनी वाढवली अजित आगरकरची डोकेदुखी! त्यांना संघात नाही घेतलं तर काय खरं नाय...

SCROLL FOR NEXT