corona marriage
corona marriage 
मराठवाडा

Coronavirus: कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून विवाह सोहळे धुमधडाक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

दीपक सोळंके

भोकरदन (जालना): मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. लग्नातील गर्दींवरही मर्यादा लावण्यात आली आहे. असं असताना सर्व नियम धाब्यावर बसवून विवाह सोहळे धुमधडाक्यात साजरे होताना दिसत आहे. त्यामुळे धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडेंनी काही दिवसांपूर्वी कोरोनासंबंधी निर्बंध घातले आहे. गर्दी टाळण्यासाठी शाळा महाविद्यालये तसेच आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे. याशिवाय मंगल कार्यालयांना नोटीसा देऊन केवळ 50 जणांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर  प्रशासनाने मंगल कार्यालय मालकांना नोटीसा दिल्या असून कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहे.

वधू, वर पक्षाकडील बऱ्याच जणांनी मंगल कार्यालयाच्या बुकिंग रद्द केल्या असून, हे विवाह सोहळे आता शेतात, मोकळ्या जागेत, मैदानावर पार पाडत आहे. विशेष म्हणजे शहरासह ग्रामीण भागातील या विवाह सोहळ्याना हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एका प्रकारे विवाह सोहळ्याना होणारी गर्दी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असून, प्रशासनाला याची कानोकानी माहिती देखील मिळत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोना मंगल कार्यालयातच होतो का..?

मंगल कार्यालयात पार पडणाऱ्या विवाह सोहळ्याना केवळ 50 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण मंगल कार्यालयात कार्यक्रम टाळत आहे. तर हेच विवाह बाहेर हजारोंच्या संख्येने पार पडत आहे. त्यामुळे कोरोना मंगल कार्यालयात विवाह केल्यानंतरच होतो का? असा संतप्त प्रश्न काही मंगल कार्यालय चालकांकडून उपस्थित केला जात आहे. 

मास्क, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा-

विवाह सोहळ्याना होणाऱ्या गर्दीत मास्क, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत आहे. नियमांना केराची टोपली दाखवली जात असून, याला सर्वसामान्य जनतेसह याकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही शासकीय अधिकारी व कर्मचारीही हातभार लावत असल्याने या बेजवाबदारीने कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT