Congress BJP 
मराठवाडा

केवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे, भाजप कार्यकर्त्यांवर का नाही : अशोक पाटील निलंगेकरांचा सवाल

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निलंग्यात काँग्रेसने धरणे आंदोलन केले. या प्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. भाजपाकडूनही पूर्वी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने केली. मात्र त्यांच्यावर गुन्हे का? दाखल केले जात नाहीत असा सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी केला.
अशोक बंगला येथे रविवारी (ता.२८) रोजी आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. निलंगेकर म्हणाले की, १२० दिवसांपासून केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी राज्यभर काँग्रेसचे धरणे आंदोलन पुकारले होते.

निलंगा येथे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाबाबतीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला माहिती देऊनही प्रशासनाकडून जिल्ह्यात जमाबंदी आदेश असताना आंदोलन करू नका म्हणून कोणतीही लेखी अथवा तोंडी कळवले नाही. कोरोना संसर्गाचे संपूर्ण नियम पाळून आम्ही शुक्रवारी (ता.२६) रोजी आंदोलन केले. मात्र, माझ्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांवर जमाबंदी आदेशाचे उलंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राज्य शासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केली गेली आहेत. त्यांच्यावर का? गुन्हे दाखल झाले नाहीत. तालुका प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे. असा सवाल उपस्थित करून  निलंगेकर म्हणाले की, जनतेच्या हिताच्या प्रश्नांसाठी असे अनेक गुन्हे दाखल झाले तरी माघार घेणार नाही.

राज्यातील विरोधी पक्ष हा लोकांच्या हितासाठी काम करत नसून सत्तेत बसण्यासाठी बिनबुडाचे आरोप करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यानी पाणीपुरवठ्याची ८५ किलोमीटरची योजना निलंगा शहरासाठी कार्यन्वीत केली. मात्र नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना 'आयते वाढून ठेवलेले ताट' निट खाता येईना. मुबलक पाणी व यंत्रणा असतानाही त्यांच्याकडून वेळेवर पाणी दिले जात नाही असा आरोप करून पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली शहरातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. शहर पंधरा दिवसापासून आंधारात आहे. शहरात गेल्या २३ दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. मीटर बसवून पैसे काढले जात आहेत.

ते कोणत्या निकषावर घेतले जातात याचा हिशोब नगरपालिकेने द्यावा. तसेच केलेल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी शेवटी निलंगेकर यानी केली. मीटरच्या नावाखाली घेतलेल्या पैशातूनच शहरातील विजबिल भरणा करावा अशी मागणी करून शहराच्या विकासासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी सत्ताधारी नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे शहराच्या विकासासाठी निधीची गरज आहे. म्हणून कधीही मागणी केली नाही. आम्ही तुमच्या सोबत राहून विकासनिधी खेचून आणू असा सल्लाही निलंगेकर यानी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, दयानंद चोपणे, अशोक शेटकार, पंकज शेळके, लाला पटेल, अनिल अग्रवाल आंबादास देशपांडे, सुरेंद्र धुमाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT