Manoj Jarange Patil  Sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil : अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही - मनोज जरांगे

आरक्षणाचा गुलाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंगावर घेतला आहे त्याचा अपमान होऊ देऊ नका, शासनाने अध्यादेश , मसुदा ,सगे सोयरे,या बाबतची गुरुवार ( ता.15 ) पर्यंत अंमलबजावणी करावी तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही

दिलीप दखने

वडीगोद्री : आरक्षणाचा गुलाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंगावर घेतला आहे त्याचा अपमान होऊ देऊ नका, शासनाने अध्यादेश , मसुदा ,सगे सोयरे,या बाबतची गुरुवार ( ता.15 ) पर्यंत अंमलबजावणी करावी तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असे मनोज जरांगे यांनी सोमवार( ता.12) रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

मनोज जरांगे हे शनिवार (ता.10 ) पासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत. त्यांचा सोमवार( ता.12) रोजी उपोषणाचा तिसरा दिवस असुन त्यांनी अन्न, पाणी,व वैघकिय उपचार घेण्यासाठी नकार दिला आहे.

त्यांना उठता, बसता येत नाही तरही ते उपोषणावर ठाम आहेत. कायद्याची अंमलबजावणी करावी करीता महाराष्ट्र बंदची हाक हि समाजाने दिली आहे मी समाजाच्या पुढे जाणार नाही, जो निर्णय समाजाने घेतला आहे तो शांततेत करावा असी आपली इच्छा आहे.

कायदा करणे बाबत शासन बोलत नाही, जो पर्यत निर्णय होत नाही तो पर्यन्त मी उपोषण मागे घेणार नाही, हटनार नाही असे जरांगे यांनी सांगितले, मराठे मुंबईला परत येणार नाही असे शासनाला वाटत असेल तर त्यांनी 15 तारखेनंतर बघावे आम्ही परत मुंबईला येतो कि नाही,

याचा 15 तारखेपर्यंत निर्णय झाला नाही तर परत आम्हाला मुंबईला येण्याबात विचार करावा लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी शासनाला दिला आहे. आरक्षण बाबत टप्पे शासनाने पाडले आहे, विशेष अधिवेशन घेऊन कायदा पास करण्याची जबाबदारी शासनाचि आहे शासनाने कायद्याची लवकर अंमलबजावणी करावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदत करत आहे,

आधी आरक्षण भेटु द्या सर्वांचा फायदा होईल या वेळी पीएचडी धारक यांच्या प्रश्नांवर विद्यार्थांना जरांगे यांनी खडे बोल सुनवले ते म्हणाले आपल्या पुरते पाहु नका गोर गरीब मुलाचा फायदा होण्यासाठी एकत्र येऊन आवाज उठवा सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे हि माझी भूमिका आहे असे जरांगे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहे असा प्रश्न जरांगे यांना पत्रकाराने विचारला यावर जरांगे यांनी सांगितले की, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही, भेट घेण्याचा विषय नाही, आम्ही आरक्षण करीता एकत्र आलो आहे मुंबई सह देशात आंदोलन उभा करू असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

काहिंना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे असि संख्या कमी आहे त्याना पाहिजे असेल तर वेगळ आरक्षण द्या तेही टिकणारे आरक्षण पाहिजे नाही तर त्यांचे हि नुकसान होईल आम्हाला आमचे टिकणारे ओबीसी मधिल आरक्षण देण्यासाठी शासनाने वेळ लावु नये, लवकर विशेष अधिवेशन बोलावुन सगे सोयरे बाबत कायदा करा , अंमलबजावणी करा व गुन्हे वापस घ्यावे त्या शिवाय उपोषण मागे घेणार नाही.

- मनोज जरांगे ,अंतरवाली सराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT