aurangabad garbage issue
aurangabad garbage issue 
मराठवाडा

औरंगाबादेत प्रश्न कचरा पेटला; आंदोलकांनी कचऱ्याच्या 2 गाड्या पेटवल्या 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरुन आंदोलन पेटले असुन औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोधानंतर पोलीसांनी लाठीमार करुन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने तुफान दगडफेक करत कचऱ्याच्या दोन गाड्या पेटवल्या. दगडफेकीत दोन गाड्यांचे नुकसान झाले असुन नऊ पोलीस जखमी झाले आहेत. 

मागील 20 दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्‍न आंदोलनामुळे गंभीर झालेला आहे. शहराच्या परिसरातील गावांमध्ये कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. अनेक वेळा येथील आंदोलन हिंसक झाले आहे. आज बुधवारी मिटमिटा भागात कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाड्या अडवून त्या पेटवून देण्यात आला. जमाव मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार केला यानंतर तुफान दगडफेक झाली. येथील आग आटोक्‍यात आणण्यासाठी तीन अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर पोलीस उपायुक्त दीपाली धाटे घाडगे, विनायक ढाकणे हे परिस्थीतीवर नियंत्रण ठेऊन आहेत. सध्या पोलीस आक्रमक झाल्याने जमाव पांगवण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT