mucormycosis
mucormycosis mucormycosis
मराठवाडा

चिंताजनक! म्युकरमायकोसिसने लातुरात १४ जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

लातूर: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होत असतानाच कोरोनानंतरच्या आजारामुळे रुग्ण त्रस्त होत आहेत. यात म्युकरमायकोसिस (mucormycosis) या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात या आजाराची १८० जणांना बाधा झाली असून, १४ जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाच्या काळात रेमडेसिव्हिरचा तुटवडा झाला होता. आता या आजारातही ऍम्फोटेरिसिन या इंजेक्शनचाही मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण तसेच त्यांचे नातेवाइकांची या औषधासाठी धावाधाव सुरू आहे. त्यामुळे कोरोना तसेच त्यानंतर होणारा म्युकरमायकोसिसचा धोका कायम आहे. त्यामुळे जिल्हा अनलॉक झाला असली तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. प्रशासनाने लावलेला लॉकडाउन त्यात नागरिकांनी काळजी घेतल्याने त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. रोज दीड दोन हजार नवे रुग्ण येण्याचे प्रमाण आता शंभराच्या आतमध्ये आले आहेत. पॉझिटीव्हीटी रेट अत्यंत कमी झाला आहे. त्याचा परिणाम जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. तर दुसरीकडे कोरोनानंतर अनेक रुग्णांना वेगवेगळ्या आजाराचा सामना करावा लागत आहे. यात म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८० जणांना याची बाधा झाली आहे. या आजाराने १४ जणांचे बळी घेतले आहेत.

सध्या शासकीयसह काही खासगी रुग्णालयात ८० रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या काळात रेमडेसिव्हिरच्या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला होता. या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले होते. प्रशासनाने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले तरीदेखील काळ्या बाजारातून याची विक्री होत गेली. सुरवातीच्या काळात तर तीस चाळीस हजार रुपयांना अनेकांनी हे इंजेक्शन खरेदी केले. आता तशीच काही परिस्थिती म्युकरमायकोसिसच्या ॲम्फोटेरिसिन इंजेक्शनच्या बाबतीत निर्माण होत आहे. या इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईक सध्या बेजार आहेत. म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर काहींना म्युकरमायकोसिसच्या गुंतागुंतीचा सामना करावा लागत आहे. या आजाराने आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८० जणांवर उपचार सुरू आहेत. यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी रोज चारशे इंजेक्शनची गरज आहे. पण, त्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. जास्ती जास्त इंजेक्शन उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक, लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT