RTE Sakal
मराठवाडा

औरंगाबाद : उद्यापासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी

आरटीई प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण : आता रिक्त जागांवर मिळणार प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - आरटीई प्रवेशासाठीची पहिली फेरी पूर्ण झाली असून, आता उर्वरित रिक्त जागांवरील प्रवेश आणि प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मंगळवारपासून (ता. १७) सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा. यासाठी मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यातंर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, १० मे रोजी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची पहिली फेरी संपली. यंदा प्रवेशासाठी ५७५ शाळा पात्र ठरल्या असून, ४ हजार ३०१ जागांसाठी १७ हजार २२१ अर्ज आले आहेत. यापैकी पहिल्या ड्रॉ मध्ये ४ हजार १९३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यापैकी २ हजार ७१० जणांचेच प्रवेश निश्चित झाले असून, १ हजार ३८८ जागा रिक्त आहेत.

पात्र शाळांना प्रवेशानंतर उर्वरित रिक्त जागांची माहिती देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदतही शुक्रवारी १३ मे रोजी संपली आहे. आता उर्वरित जागा आणि प्रतीक्षा यादीतील पालकांच्या पाल्यास प्रवेशासाठी मंगळवारी (ता.१७ मे) रोजी एसएमएसद्वारे प्रवेशाची पुढील प्रक्रिया कळविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT