आमदार राणाजगजितसिंह पाटील
आमदार राणाजगजितसिंह पाटील  
मराठवाडा

सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा रेशन दुकानातून करावा

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेत सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गोरगरीबांना स्वस्त धान्य दुकानामार्फत गहू, तांदूळ व डाळीबरोबरच तेल, साखर, साबण, सॅनिटायजर व मास्कचा पुरवठा करावा, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी (ता. २७) एका पत्राद्वारे केली आहे.

या संदर्भात आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळीवर केंद्र व राज्य सरकारचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. हातावर पोट असलेले बहुतांश नागरिक लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीपासून घरी बसून आहेत. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना दररोज मजुरी करावी लागते, त्यातूनच मिळणाऱ्या अल्पशा मिळकतीत ते आपला आपला उदरनिर्वाह भागवतात, अशा लोकांसाठी सरकार कायम तत्पर राहून काम करते. प्रशासनाने एप्रिल महिन्याचे रेशन लोकांना उपलब्ध झाल्याचे समजते, ही दिलासादायक बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले.

या विशेष पॅकेजमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ८० कोटी लोकांना पुढच्या तीन महिन्यांपर्यंत अधिकचे पाच किलो तांदूळ, गहू दिला जाणार आहे. याशिवाय एक किलो डाळ प्रत्येक कुटुंबाला अल्पदरात देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. 
याच धर्तीवर लॉकडाउनच्या काळात राज्य शासनाने राज्यातील गरजू नागरिकांसाठी प्रतिकुटुंब तेल व साखरेचा पुरवठा करणे महत्वाचे वाटते. यातून या लोकांच्या महत्वाच्या गरजा भागतील. ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही, अशा नागरिकांची नोंद घेऊन त्यांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील कोरोना सहाय्यता कक्षामार्फत योजना राबवावी. तसेच कोरोना विषाणूंपासून संरक्षणासाठी मास्क, सॅनिटायजर, हँडवॉश किंवा साबण प्रत्येक रेशन दुकानावरच अल्प दरात उपलब्ध करून देण्याबाबत पाऊले उचलणे महत्वाचे आहे.

या बाबींचा गांभीर्याने विचार करून राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेत सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये गोर-गरीब व गरजू लोकांना रेशन दुकानामार्फत गहू, तांदूळ व दाळी बरोबरच तेल, साखर, साबण, सॅनिटायजर व फेस मास्कचा पुरवठा अल्पदरात करावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT