file photo
file photo 
मराठवाडा

अत्यावशक सेवेची परवानगी मिळालेल्या वाहनातून गैरपद्धतीने प्रवासी वाहतूक

सयाजी शेळके

उस्मानाबाद : संचारबंदीच्या काळात अत्यावशक सेवेसाठी परवानगी दिलेल्या वाहनाच्या चालकांकडून गैर पद्धतीने प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा वाहनावर कडक निर्बंध लावण्याची गरज असल्याचा सूर आता उमटू लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आढळलेला दुसरा कोरोनाबाधित रुग्ण संचारबंदी असतानाही अशा वाहनातून मुंबईतून लोहाऱ्यात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी अत्यावश्यक सेवा म्हणून अनेक वाहनांना गरजेच्या वस्तूंची ने-आण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या अनेक वाहने महामार्गावरून धावताना दिसतात. मात्र मुंबई आणि पुणे या ठिकाणचे अनेक नागरिक अशा वाहनातून ग्रामीण भागाकडे स्थलांतरित होत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांकडून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढत आहे. गुरुवारी उस्मानाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी दोन रुग्ण आढळून आले. दोन्ही रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातून आले आहेत. एक जण दिल्ली ते पानीपत टूरला गेला होता. तो २६ मार्चला गावाकडे परतला असून, तर दुसरा मुंबई येथून आलेला आहे. मुंबई येथून आलेल्या या रुग्णाने खासगी वाहनातून प्रवास केल्याचे उघडकीस आले आहे. भाजीपाला घेऊन जाणारे ते वाहन असल्याचे बोलले जात आहे. मुंबई येथे तो ताज हॉटेलमध्ये काम करीत होता. त्यानंतर त्याने भाजीपाला वाहतुकीसाठी परवाना मिळालेल्या वाहनाने मुंबईहून येणेगूरपर्यंत (ता. लोहारा) असा प्रवास केला. तो येणेगूर येथून दुधाच्या टेम्पोतून गावाकडे आला होता.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्ह्यात आढळलेला पहिला रुग्णही संचारबंदीच्या काळातच गावात आला आहे. संचारबंदीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सध्या राहत असलेल्या ठिकाणीच प्रत्येकाची राहण्याची आणि जेवणाची सोय शासनाकडून केली जात आहे, त्यामुळे संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करणे असताना आवश्यक आहे. शासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतानाही अनेकांकडून संचारबंदीचे उल्लंघन केले जात आहे.

अनेक नागरिक असे असतानाही मूळगावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही अशा नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देण्यात आलेल्या वाहनातूंन प्रवासी वाहतूक होत आहे का, याची प्रत्येक नाक्यावर तपासणी होणे गरजेचे आहे. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध आणण्याची गरज सर्वसामान्य वर्गातून व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT