file photo
file photo 
मराठवाडा

बॅंंकाची सुलतानी वसुली सुरुच; सरकारची संवेदनशिलता संपली- देवेंद्र फडणवीस

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : मागील महिण्यात पडलेल्या पावसाने शेतीचे अभुतपूर्व नुकसान झालेले आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे आहे. परंतू तसे न होता बॅंकांच्या सुलतांनी वसुलीचा तगादा लावण्यात आला आहे. यावरूनच सरकारची संवेदनशिलता संपली आहे हे सिध्द होते अशी टिका विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.21) जिंतूर तालुक्यात केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी जिंतूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी पाचेगाव सह इतर शिवारातील नुकसानीची पाहणी केली.

काही ठिकाणी बियाणे बोगस निघाल्याने शेतात काहीच उगवले नाही

यावेळी शिवारात जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांचा श्री. फडणवीस यांच्यासमोर पाढाच वाचला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी सरकार भाग पाडले जाईल असा विश्वास दिला. पुढे बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. मराठवाड्याचा दौरा करत असतांना या भागात अभुतपूर्व नुकसान झाले असल्याचे दृष्टीस पडत आहे. सलग मोठा पाऊस झाल्याने त्याचा विपरित परिणाम मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतात दिसून आला. अनेक शेतातील पिके हातची गेली आहेत. काही ठिकाणी बियाणे बोगस निघाल्याने शेतात काहीच उगवले नाही.

सुलतानी पध्दतीने बॅंकाची वसुली सुरु

सोयाबीन व कापसासह इतर पिकांची देखील अशीच आवस्था दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतू त्यांचे पंचनामे कऱण्याचे काम तातडीने केले जात नाही हे या राज्याचे दुदैव आहे. त्यामुळे पुढील रब्बीची पेरणी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांकडे पैसा नाही. काही ठिकाणच्या जमीनी खरडून गेल्या आहेत. त्यासाठी माती आणावी लागणार आहे. त्याला ही पैसा लागणार परंतू शेतकऱ्यांचे खिसे रिकामे राहाणार नाहीत याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. अश्या विदारक परिस्थितीमध्येही बॅंकाकडून अनेक शेतकऱ्यांना कर्ज भरण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सुलतानी पध्दतीने बॅंकाची वसुली सुरु आहे. याकडे मात्र राज्य सरकारचे साफ दुर्लक्ष होत आहे. यावरूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकारची संवेदनशिलता संपली असल्याचे ते म्हणाले. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल असे वाटत होते. परंतू या सरकारने अपेक्षाभंग केला आहे असे ते म्हणाले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT