मराठवाडा

आठ दिवसात गुन्हे मागे घ्या, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

उमेश वाघमारे

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले. मात्र घनसावंगी येथे काही समाज कंटकांनी मोर्चात घुसुन दगडफेड केली. गुन्हे मात्र मराठा समाजाच्या तरुणांवर आणि मोर्चा आयोजकांवर  दाखल केले आहेत. हे गुन्हे ता.8 ऑगस्टापर्यंत मागे घेतले नाही, तर निर्माण  होणाऱ्या परिणामास लोकप्रतिनिधि आणि प्रशासन जबाबदार असेल, असे मराठा क्रांती मोर्चाच्या सोमवारी (ता.30) आयोजित पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  (ता. 1) ऑगस्टपासून शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा येथे बेमुदात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 8 ऑगस्टपासून मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. घनसावंगी येथे झालेली दगडफेक ही मराठा समाजातील तरुणांणी केले नाही. पोलिस प्रशासन आणि न्यायदंडाधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर फुटेज चेक करावे, त्यात जर दगडफेक करताना कोणी अढळ्यास त्यावर कारवाई करा. मात्र विनाकारण दाखल केले गुन्हे तत्काळ मागे घ्या अशी मागणी ही आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT