Ujjani highway bridge water problem inconvenience citizens rainy season sakal
मराठवाडा

उजनी : महामार्गालगतच्या पाण्याचा प्रश्न कायम

उजनीच्या नागरिकांची यंदाही पावसाळ्यात होणार गैरसोय?

सकाळ वृत्तसेवा

उजनी : येथील औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाण्याचा प्रश्न काही केल्या मिटत नसल्याचे दिसून येत आहे. मागिल वर्षी प्रकल्प संचालकांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. याला वर्ष लोटले असून दुसरा पावसाळा तोंडावर आहे. मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यास महामार्ग प्रशासन असमर्थ राहिले आहे. दरम्यान अतिरिक्त पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे येथील ग्रामस्थ आता चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

उजनी (ता. औसा) येथील ग्रामस्थांना दोन ते तीन वर्षापासून पावसाळयात एका समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ लगतच्या अतिरिक्त पाण्यामुळे. या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर रस्त्यालगतच्या शेतातील पाणी जवळच्या तेरणा नदीत जाण्यासाठी मार्गच काढून दिला नसल्याने हे पाणी उजनी मोडवरील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वहायला लागून रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. परिणामी येथील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, प्रवाशी आदींना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो.

एवढंच नाही तर पुढे हे पाणी या परिसरातील घरांनी शिरते. यामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळित होत आहे.विशेष बाब म्हणजे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या परिस्थितीची कल्पना खासदार, आमदार तसेच महामार्ग प्रशासनाला असून देखील त्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याहीवर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास महामार्ग प्रशासनाच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे येथील ग्रामस्थानी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT