Nipun-Vinayak
Nipun-Vinayak 
मराठवाडा

पंचवीस वर्षांतल्या चुका २५ दिवसांत कशा सुधारणार?

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शहरातील पाणीपुरवठ्यात गेल्या २५ वर्षांत अनेक चुका झाल्या आहेत. त्या मी २५ दिवसांत कशा सुधारणार, असा सवाल सवाल महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आंदोलनकर्त्या महिलांना केला. 

शहरातील सुमारे १५ लाख नागरिकांना पाणी पुरविताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांच्या माध्यमातून गरजेपेक्षा निम्मेच पाणी मिळत असल्याचे महापालिकेने नियुक्त केलेले अभ्यासक राजेंद्र होलाणी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाने जुन्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला आहे. नव्या लाइन टाकताना गुंठेवारी वसाहतींना (नो नेटवर्क एरिया) वगळण्यात येत आहे. सोमवारी गुंठेवारी भाग असलेल्या न्यू हनुमाननगरातील महिलांनी आंदोलन केले. यावेळी आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहराची वाढती गरज व येणारे पाणी याबाबत चिंता व्यक्त केली. पाणीपुरवठा योजनेत गेल्या २५ वर्षांत अनेक चुका झाल्या आहेत. त्या मी २५ दिवसांत कशा सुधारू शकतो? असा सवाल त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना केला.

...तोपर्यंत मिळेल
एका महिलेने पाण्याची वाट पाहून मी म्हातारे झाले, आता तरी पाणी मिळणार का? असा प्रश्‍न आयुक्तांना केला. त्यावर आयुक्तांनी तुम्ही अद्याप म्हाताऱ्या झाल्या नाहीत. म्हाताऱ्या होईपर्यंत पाणी मिळेल, असा दावा केला. 

वाहतेय पाणी
पाण्याच्या टाक्‍या भरल्यानंतरही कोणी वॉल्व्ह बंद करण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे पाणी वाया जाते. मी अनेक टाक्‍या पाहिल्या त्या ठिकाणी असेच चित्र आहे, असे आयुक्तांनी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेते विकास जैन यांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT