Wheat-crop
Wheat-crop 
मराठवाडा

गव्हाच्या पेऱ्याला पाणीटंचाईचा फेरा!

वृत्तसंस्था

भादा - आला आला आणि भरपूर झाला म्हणून शेतकऱ्यांना खूश करणाऱ्या पावसाच्या पाणी पातळीने चालू हंगामात शेतकऱ्यांना चांगलाच "चकवा' दिला असून भादा व परिसरातील काही विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी तर घड्याळ लावून "तासावर' आल्यासारख्या आहेत. त्यामुळे गव्हाला पाणी पुरेल की नाही, अशी शेतकऱ्यांना चिंता आहे.

सलग तीन ते चार वर्षांच्या दुष्काळात होरपळलेला शेतकरी काठोकाठ भरलेल्या विहिरी पाहून सुखावला होता; मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना गरजेच्या काळातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.

रब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारी ही पिके कशीबशी कमी पाण्यावर तरतात; मात्र गव्हाला मुबलक प्रमाणात पाणी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गव्हाचा पेरा केलेले शेतकरी पाणीटंचाईमुळे हैराण आहेत. कारण ऐन गरजेच्या काळातच गहू पिकास मुबलक पाणी लागते; मात्र सध्या खालावलेल्या पाणीपातळीमुळे काही ठिकाणी गव्हाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार असून, गव्हाचा एकूण हेक्‍टरी उत्पादन खर्च आणी एकूण हेक्‍टरी उत्पादन याचा ताळमेळ लावताना शेतकऱ्यांची दमछाक होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला जबरदस्त दुहेरी धक्का! रहाणेपाठोपाठ शिवम दुबे 'गोल्डन डक'वर बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT