खर्डी : अपघातामध्ये काळी-पिवळी व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
खर्डी : अपघातामध्ये काळी-पिवळी व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. 
मुंबई

कंटेनर अपघाताचा थरार!

सकाळ वृत्तसेवा

खर्डी : कसारा घाटाच्या नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळया घेऊन निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरची लहान-मोठ्या ९ वाहनांना धडक बसून विचित्र पण थरारक अपघात झाला. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात दहा जण जखमी झाले. त्यात तीन मुलांचाही समावेश आहे. या अपघातानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रविवारी (ता. ३) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास नाशिकहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळया घेऊन निघालेल्या कंटेनरचा ब्रेक कसारा घाटात निकामी झाल्याने कंटेनरने मार्गात येणाऱ्या ९ वाहनांना जोरदार धडक दिली. अखेर एका मालवाहू ट्रकला व एच. पी. गॅसने भरलेल्या टॅंकरला शेवटची धडक बसल्याने अपघाताचा हा थरार संपला.

कंटेनरच्या जोरदार धडकेने वेगवेगळ्या वाहनांतील तीन चिमुकल्यांसह सात प्रवासी गंभीर जखमी झाले. यात कसारा-नाशिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

घडलेला अपघात पाहिल्यानंतर नाशिकमधील येवला येथील सुनील पैठणकर व विनोद पाटील यांनी तत्काळ सदर घटनेची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी तत्काळ इगतपुरी येथे दाखल करण्यात आले. या घटनेने सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा 
लागल्या होत्या.

हेमंत प्रल्हाद सुतार (५०), अलका बाळू मोरे (४०), विधी दीपक गांगुर्डे (२१), भाग्यश्री किरण शेळके (२४), श्वेता सुभाष दरवडे (२२), पूजा दीपक गांगुर्डे (२५) अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यात तीन चिमुकल्यांचा समावेश आहे; तर अन्य तीन जखमी झालेल्या प्रवाशांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याने त्यांची नावे समजू शकली नाही. 

गॅसगळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला
शेवटची धडक दहाहून अधिक टन गॅस भरून निघालेल्या ट्रॅंकरला दिल्यानंतर घाटातील परिस्थिती फारच बिकट बनली होती. सुदैवाने गॅसगळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला. या थरारक घटनेत अनेक प्रवाशांच्या जीवावर ओढवलेले संकट दूर झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. रविवारी (ता.३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरूच होता. घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग घोटी केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, कर्मचारी एस. के. हिरे, वाय. डी. पाटील, एम. आर. सावकार, कसारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. बी. महाले कर्मचारी कुणाल बावदाने, बाळू चौधरी तसेच पीक इन्फ्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT