मुंबई

विद्यार्थ्यांच्या विनापरवाना वाहतुकीवर दंडुका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिक्षामधून प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचा आदेश सोमवारी (ता. २५) मुंबई उच्च न्यायालयाने दिला. रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी नाही. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्‍यता असल्याने कारवाई आवश्‍यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने नियमांचे पालन करत नाहीत आणि सुरक्षेबाबतच्या निर्देशांचे उल्लंघन केले जाते, असे मांडणारी जनहित याचिका पीटीए युनायटेड फोरम या पालक आणि शिक्षक संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सोमवारी सुनावणी झाली. रिक्षातून प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही. सुरक्षेच्या कारणांसाठी यापुढेही अशा प्रकारची परवानगी देण्याचा प्रस्ताव नाही. त्यामुळे सरकार कारवाई करत आहे, अशी माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली. 

यासंदर्भात १० डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती कुंभकोणी यांनी दिली. पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे, असे न्यायालयाने बजावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT