पुराच्या पाण्यात वाहून गेलेला पूल
पुराच्या पाण्यात वाहून गेलेला पूल 
मुंबई

530 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्‍यात चारही नद्यांना पूर आला होता. पुरात अडकलेल्या 530 पेक्षा अधिक लोकांना वाचविण्यात यश आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

भातसा, काळू, बारवी आणि उल्हास या नदीच्या काठावर असलेल्या गावांत पुराचे पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील सर्वाधिक फटका म्हारळ, कांबा, वरप, आणे रायते आपटी, पावशेपाडा आदी गावांना बसला. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पुराच्या पाण्याखाली असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

पुरामुळे म्हारळ आणि वरप गावाला मोठा फटका बसला, तो येथील बांधकामांमुळे. म्हारळ येथे थारवानी व इतरांनी पाण्याच्या प्रवाहात बांधकाम केले आहे; तर वरप येथे साईबाबा नगरच्या मागील बाजूने पत्र्याचे कूंपण उभे केल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने लोकांच्या घरात पाणी घुसले. कल्याण तालुक्‍यातील बाधित गावांची पाहणी आज गट विकास अधिकारी रमेश अवचार यांनी केली. 

लोकप्रतिनिधी गायब 
पुराच्या पाण्याचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना लोकप्रतिनिधींनी अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे दिसून आले. उल्हास नदीस आलेल्या पुरामुळे म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा येथील लोकांना सर्वात मोठा फटका बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Lok Sabha Election : उदयनराजेंची बोगी नरेंद्र मोदींच्या विकासाच्या इंजिनला जोडा; फडणवीसांचे मतदारांना आवाहन

Devendra Fadnavis : नरेंद्र मोदींवरील विधानावरून शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांचा इशारा

SCROLL FOR NEXT