bhumiputra sanghtna contest kalyan lok sabha election
bhumiputra sanghtna contest kalyan lok sabha election sakal
मुंबई

Lok Sabha Poll : कल्याण लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार भूमिपुत्र संघटना

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघात कायमच आयात उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. येथील स्थानिक भूमीपुत्रांच्या समस्या जाणून त्यासाठी लढणार उमेदवार असावा अशी कायम येथील स्थानिकांची अपेक्षा राहिली आहे.

राजकीय पक्ष याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याने अखेर येथील भूमिपुत्र संघटनांनी एकत्र येत कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते यासाठी पुढे सरसावले असून उमेदवाराची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचा उमेदवार दिला आहे. मात्र महायुतीने अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारास संधी देण्यात येईल असे बोलले जात आहे.

स्थानिक भूमिपुत्र उमेदवारास संधी देण्यात यावी अशी मागणी येथील भूमीपुत्रांची कायम राहिली आहे. मात्र महायुतीने येथे आतापर्यंत आयात उमेदवारास संधी दिली असल्याने स्थानिक नाराज आहेत.

यामुळे येत्या निवडणूकित ठाणे पंचक्रोशीतील भूमिपुत्र संघटनांनी एकत्र येत भूमीपुत्रांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी कल्याण लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे. मंगळवारी सायंकाळी निळजे येथील कालिका माता मंदिर येथे पत्रकार परिषद संघटनांच्या वतीने घेण्यात आली.

यावेळी मोतीराम गोंधळी, भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे अधक्ष महेंद्र पाटील, भालचंद्र पाटील, मंगेश भोईर, श्री मलंग मुक्ती आंदोलनाचे राजेश गायकर, ओमकार पावशे, रोशन भोईर, रविंद्र पाटील, कल्पेश पाटील, गोरखनाथ पाटील हे उपस्थित होते.

भूमिपुत्र संघटनेचे निवडणूक लोकप्रतिनिधी भालचंद्र पाटील यावेळी म्हणाले, आगरी रेल सहकार (कल्याण), रेल्वे भूमिपुत्र संघटना (कल्याण), शेतकरी भूमिपुत्र संघटना (ठाणे), भूमिकन्या संघटना (ठाणे), भूमिपुत्र धर्माभिमानी संघटना (भारत देश) अशा अनेक संघटनांचा यासाठी दुजोरा मिळाला आहे.

भूमिपुत्र आपला उमेदवार निवडणूक रिंगणात आणण्याचे ठरवण्यात आलेले असून तीन अपक्ष उमेदवार इच्छुक असून नाव फायनल झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल. मात्र भूमिपुत्र संघटना अपक्ष उमेदवारी घेऊन लढणार हे निश्चित आहे.

कल्याण मतदार संघातून तिघांच्या नावाची चर्चा आहे. यात मोतीराम गोंधळी यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक वसंत पाटील यांच्या वयोमानाच्या मर्यादेमुळे उमेदवारीची मागणी मागे घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमचा उमेदवार लोकसभा निवडणुक लढविणार हे मात्र निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भूमीपुत्रांच्या अनेक समस्या आहेत. टोरंटोचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण, जमिनी बळकावण्याचे वाढते प्रकार, शहरातील डम्पिंग ग्रामीण भागात आणले जाते यांसारख्या अनेक समस्या प्रश्न आहेत.

त्या सोडवण्यासाठी आपला कोणीतरी माणूस असावा, त्याला त्या प्रश्नाची जाण असेल अशी येथील भूमीपुत्रांची मागणी अपेक्षा राहिली आहे. व त्यासाठी आम्ही उमेदवार उभा करणार असल्याचे यावेळी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT