sharad pawar and mamta banergee
sharad pawar and mamta banergee esakal
मुंबई

भाजपचा पराभव ममतांच्या अहंकाराने नव्हे तर..; पटोलेंची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या ‘यूपीए’संबंधित विधानावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. व्यक्तिगत अंहकाराने भाजपचा पाडाव करता येणार नाही असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नमूद केले. तर गांधी परिवाराला काही शिकविण्याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी ऐक्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न यशस्वी होवू देवू नका अशी अपेक्षाही करण्यात आली.

‘‘भारतीय जनता पक्ष हा देशाची घटना आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पाहत आहे. वैयक्तिक महात्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपविरोधातील लढाई अहंकाराने नाही तर, एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे,’’ असे प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले, ‘‘सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि घटनेला संपविण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. राहुल गांधी हे मोदी आणि भाजपविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात लढले.’’

‘‘भाजपची विभाजनवादी नीती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे,’’ असेही पटोले म्हणाले.

‘‘मागील सात वर्षे केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते आहे. देशभरातील बिगरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही,’’ असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT