file photo 
मुंबई

'या' वाहनांसाठी मोजावे लागणार अधिक पैसे 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विदेशातून आयात होणाऱ्या विजेवरील वाहनांसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2020-21 च्या अर्थसंकल्पात इलेक्‍ट्रिक वाहनांवरील सीमा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थानिक स्तरावर इलेक्‍ट्रिक वाहने उत्पादन करण्याला प्रोत्साहन देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना मेक इन इंडिया योजने अंतर्गत मोबाईल फोन, इलेक्‍ट्रिक वाहन आणि इतर साहित्यासाठी अधिक सीमाशुल्क घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे देशात उत्पादनाला चालना मिळणार आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांवरील सीमा शुल्क दराबाबत सध्या अभ्यास करण्यात येत आहे.

याचसोबत मोबाईल आयात शुल्कातही वाढ करण्यात येणार आहे. देशांतर्गत इलेक्‍ट्रिक वाहन उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार 1 एप्रिल 2020 पासून आयात होणाऱ्या व्यावसायिक इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी सीमाशुल्कात 25 टक्‍क्‍यांवरून 40 टक्‍के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रवाशी वाहनांसाठी (एसकेडी) आयात शुल्कात 15 टक्‍क्‍यांवरून 30 टक्‍यांपर्यंत वाढ केली आहे.

याचप्रकारे इलेक्‍ट्रिक बस, ट्रक आणि दुचाकींवर सीमाशुल्कात 15 टक्‍यांवरून 25 टक्‍के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ही वाढ 1 एप्रिल 2020 पासून लागू होईल.

या प्रकारे इलेक्‍ट्रिक तिचाकी, दुचाकी, बस आणि ट्रकच्या आयात शुल्कात वाढ केल्यामुळे परदेशातून येणारी विजेवरील वाहने महाग होणारी असली तरी भारतातील विजेवरील वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. 2030 पर्यंत देशातील सर्व वाहने विजेवर चालवण्याचे सरकारचे उदिष्ठ आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagaradhyaksha Results 2025 : राज्यात भाजपा १ नंबरचा पक्ष, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? वाचा विभागनिहाय यादी...

IND vs PAK U19, Final: वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे पाकिस्तानी खेळाडूंना भिडले; विकेट्सनंतर घडली चकमक; Video Viral

Latur to Badlapur: लातूर ते मुंबई प्रवास फक्त ५.५ तासांत होणार! कोकण–मराठवाड्याला थेट जोडणारा हाय-स्पीड हायवे मंजूर, पाहा मार्ग

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

हृदयद्रावक घटना! 'टिप्परच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू'; आजारी मुलाला शाळेतून आणताना गुरसाळेत काळाचा घाला..

SCROLL FOR NEXT