Police
Police 
मुंबई

मदतीच्या अपेक्षेने फिरणाऱ्या मुलांपासून सावधान

सकाळवृत्तसेवा

मुंबई - आम्हा काश्‍मीरमधील मुलांना कोणी वाली नसल्याने मदत मागण्यासाठी मुंबईत आलो आहोत, अशी आर्जवे करीत मुलांचे अनेक घोळके मुंबईत फिरताना दिसत आहेत. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

संबंधित मुले पाच-सातच्या टोळक्‍याने पूर्व उपनगरांमध्ये फिरत आहेत. आम्ही ५०० काश्‍मिरी रहिवासी मुले असून, आमचे आईबाप व घरही गमावले आहे. काही महिन्यांपासून आमच्या शाळा व अन्य व्यवसायही बंद आहेत. त्यामुळे मुंबईत मोठ्या आशेने आलो असून, सध्या वांद्रे-बेहरामपाड्यातील मदत शिबिरात राहत आहोत. आम्हाला सढळ हाताने मदत करावी, अशा शब्दांत आर्जव करत ही मुले मदतीचे आवाहन करतात. त्यापैकी काहींनी इंग्रजीतील पत्रके काढली आहेत, तर काहींबरोबर स्थानिक रहिवासी मदतीचे आवाहन करीत फिरतात. अशा व्यक्तींबाबत सावधगिरी बाळगावी, असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

धान्य मागणीची पत्रके
तीन क्विंटल तांदूळ, एक क्विंटल डाळ, ४५ किलो तेल, ४५ किलो साखर, १० किलो चहा द्यावा, असेही पत्रकात म्हटलेले असते. आपल्याला अशा प्रकारे मदत गोळा करण्यास पोलिसांनी संमती दिल्याचे ते सांगतात. मात्र, पोलिस अशा प्रकारे कोणालाही मदत करीत नाहीत, असे जाणकारांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT