मुंबई

अकरावी प्रवेशातील ओटीपी पर्यायाने मोठा गोंधळ; ओटीपी कसा द्यायचा? पालकांचा महाविद्यालयांना प्रश्न

तेजस वाघमारे


मुंबई - अकरावी प्रवेशाच्या अल्पसंख्याक आणि इन हाउस कोट्यातील प्रवेश प्रक्रियेतील ओटीपी या पर्यायामुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला आहे. महाविद्यालयांना पालकांकडून ओटीपी देण्यास नकार देण्यात येत असल्याने मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये सात दिवसांच्या अवधीत अकरावीच्या कोट्यातील जागांपैकी अवघे दोन ते पाच टक्केच प्रवेश अपलोड होऊ शकलेले आहे. एका नामांकित महाविद्यालयांत 600 पेक्षा जास्त जागा असून त्या महाविद्यालयात अवघे दहाच प्रवेश पूर्ण होऊ शकले आहेत. 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा आमूलाग्र बदल केले आहेत. यात अल्पसंख्याक आणि इन हाऊस कोट्यातील प्रवेश करण्यासाठी अवघा सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. यातच ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक किचकट केली आहे.  या प्रक्रियेत केलेल्या बदलामुळे महाविद्यालयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विभागाने ‘ओटीपी’ची पायरी वगळावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र असोशिएशन ऑफ मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स’ने शिक्षण संचालकांकडे पत्राद्वारे केली होती. मात्र ही पायरी न वगळता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंतची मूदत देण्यात आली आहे.

जर ही पायरी वगळली नाही तर प्रवेश प्रक्रियेस होणाऱ्या उशीरास संस्था जबाबदार नसेल, असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले होते. यानंतरही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. यापूर्वी कोट्यातील प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर होत होती. यात विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे ते ऑनलाइन अर्जात कळवणे आवश्यक होते. आता मात्र शिक्षण विभागाने महाविद्यालयांना यादी पाठवली आहे. त्यातील विद्यार्थ्यांचेच प्रवेश महाविद्यालय करू शकणार आहेत. यातच प्रवेश अंतिम करताना विद्यार्थ्याच्या मोबाइलवर ‘ओटीपी’ पाठवला जातो. हा ओटीपी महाविद्यालयांमधून विद्यार्थ्याला फोन करून मागून घ्यावा लागतो. यामुळे शहरातील अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये प्रवेश पूर्ण होऊ शकलेले नाहीत. अनेक विद्यार्थी ओटीपी देण्यास तयार होत नाहीत तर काही विद्यार्थी गावाला असल्याने गोंधळ होत आहे. तरी याबाबत सरकारने वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी महाविद्यालयांकडून होत आहे.

शिक्षण विभागाने जर ही पायरी वगळली नाही तर प्रवेश प्रक्रियेस उशीर होऊ शकतो आणि त्यास महाविद्यालये जबाबदार नसतील, असा इशाराही संघटनेने दिलेल्या पत्रात दिला होता. यानंतर शिक्षण विभागाने सुधारित पत्र काढून विद्यार्थ्यांच्या लॉगइनवर ओटीपी येईल तो घेता येऊ शकतो असे स्पष्ट केले आहे. यासाठी मुदत वाढही दिली आहे. मात्र याने काही साध्य होणार नाही असे महाविद्यालयांचे म्हणणे आहे.

---------------------------------------------ॉ

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT