मुंबई : नुकतीच परमबीर सिंह यांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. सचिन वाझे प्रकरणात आयुक्त परमबीर सिंह यांच्या कार्यालयाकडून काही अक्षम्य चुका झाल्यात, म्हणूनच परमबीर सिंह यांची बदली झाल्याचं स्वतः अनिल देशमुख यांनी एका मुलाखतीत म्हंटले. यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये परमबीर सिंह यांनी थेट अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप लावलेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुली करायला सांगितल्याचे आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हंटले.
ज्या दोन अधिकाऱ्यांची नावे परमबीर सिंह यांनी पत्रात लिहिली आहेत, त्या दोन अधिकाऱ्यांचे आणि परमबीर सिंह यांचे नेमके काय संभाषण झाले ते आता समोर आलं आहे.
स्वतः परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या संवादाची कॉपी जोडली आहे.
१६ मार्च रोजी झालेलं संभाषण :
महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप ! गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंह यांचे वसुलीचे आरोप
१९ मार्च रोजी झालेलं संभाषण :
conversation between param bir singh an ACP patil about anil deshmukhs demand to collect money
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.