child labor  sakal media
मुंबई

बालमजूर वाढण्याची भीती; ३० हजार विद्यार्थी अजूनही शाळेबाहेर

अनेकांची शाळा सुटली; कोविडमुळे स्थलांतरही वाढले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड काळात (corona pandemic) रोजगार गमावलेल्या (unemployment) आई-वडिलांनी चार पैसे कमावण्यासाठी आपल्या शाळकरी मुलांनाही कामाला लावले (students doing job) आहे. त्याचबरोबर स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाल्याने मुलांची शाळा सुटली आहे. प्रवासासाठी पैसे नसल्याने (Financial crisis) काही विद्यार्थी शाळेत येत नाहीत. ही परिस्थिती केवळ ग्रामीण भागातीलच नाही, तर मुंबईसारख्या कुबेरनगरीचीही आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत शहर असणाऱ्या मुंबईत बालमजूर वाढण्याची (child workers possibility) भीती व्यक्त होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्याने राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पालकांनी संमतीपत्र दिलेल्या ८ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आता नियमित वर्ग सुरू झाले आहेत. महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये ७१ हजार ९२३ विद्यार्थी शिकत आहेत. मात्र, या शाळांतील २९ हजार ८१९ विद्यार्थी अद्याप शाळेत येत नसल्याचे कारण शोधण्यास शिक्षण विभागाने प्रयत्न केला. त्यात २४ हजार २८९ विद्यार्थ्यांना पालकांनी संमतीपत्र दिले नसल्याचे आढळले; तर तब्बल १४ हजार ६३५ विद्यार्थ्यांना पालकांनीच शाळेत जाण्यास मज्जाव केला.

मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देणाऱ्या पालकांशी चर्चा केल्यावर कोविडबरोबर आलेल्या लॉकडाऊनचे गंभीर परिणाम अधोरेखित झाले आहेत. साधारण १४ हजार ६३५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांच्या आजाराचे कारण दिले, तर ३ हजारहून अधिक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसून एक हजारच्या आसपास विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाल्याची शक्यता आहे.
शाळेत न पाठविण्याच्या महत्त्वाच्या कारणांत शिकून साहेब होण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मिळेल तो रोजगार करावा लागत आहे. त्याचबरोबर घरापासून शाळेपर्यंत येण्यासाठी प्रवासाचे पैसे नसणे, हेही कारण पुढे आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे; अन्यथा त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो.


"विद्यार्थी शाळेत येत नसल्याबद्दल सर्वेक्षण करण्यात आले. त्यात काही कारणे पुढे आली आहेत. हे विद्यार्थ्यी पुन्हा शाळेत यावेत, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यात पालक विद्यार्थ्यांचे समुपदेश करण्यात येत आहे. सेवाभावी संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत."
- राजू तडवी, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT