वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर जमलेला जमाव 
मुंबई

पोलिस म्हणतात, वांद्रयातील मजुरांची गर्दी म्हणजे कट नव्हता

अनिश पाटील

मुंबई : वांद्रे स्थानकाबाहेर मंगळवारी स्थलांतरित मजुरांनी केलेली गर्दी म्हणजे पूर्वनियोजित कट नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी ती परिस्थिती संवेदनशीलतेने आणि व्यवस्थित हाताळल्याचे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.

महत्त्वाचे ः कोरोनाचा मुकाबला करायचा असेल तर हा आहे एकमेव पर्याय

लॉकडाऊनमुळे उपाशी असलेल्या आणि त्रस्त झालेल्या स्थलांतरित मजुरांना कोणत्याही परिस्थितीत गावाकडे जायचे होते. या मानसिकतेमुळे तो प्रकार घडल्याचे मत या आयपीएस अधिकाऱ्याने व्यक्त केले. लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असल्यामुळे आपल्याला गावी जाण्यासाठी व्यवस्था केली जाईल, या प्रतीक्षेत ते होते. रेल्वेसेवा सुरू होण्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी वाहिन्यांवर रेल्वेगाड्या सोडल्या जाणार असल्याचे वृत्त दाखवण्यात आले. काही जणांनी फेसबुकवर व्हिडीओ व मजकूर टाकल्यामुळे अफवांना बळ मिळाले.

हे वाचलं का? ः ग्रीन झाेन भागातील उद्याेग सोमवारनंतर सुरू करण्यावर चाचपणी सुरू
 
वांद्रे स्थानकाजवळ मजुरांना खाद्यपदार्थ देण्यात येत होते. सरकारी अधिकाऱ्यांशी बोलण्याच्या उद्देशाने मजुरांचा एक गट तेथे आला. तेथे सरकारी अधिकारी, पत्रकार, पोलिस आल्याची अफवा झपाट्याने पसरली. त्यामुळे जवळच्या झोपडपट्टीतील शेकडो लोक तेथे पोहोचले. गावाकडे जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था केली जाईल, अशी आशा या मजुरांना होती. त्यामुळे दबाव टाकण्याच्या उद्देशाने तेथे गर्दी जमा झाली. या घडामोडींची अपेक्षाही पोलिसांनी नव्हती. 

महत्त्वाचं : कोरोना लढ्यात तीन विश्वसुंदरीही पुढे सरसावल्या!

पोलिसांनी सुरुवातीला त्यांच्याशी बोलून, जेवण देण्याचे आश्‍वासन देऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते मजूर ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत गावी जायचे होते. त्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्‍यता लक्षात घेत पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. आतापर्यंतच्या तपासात हा प्रकार कटाचा भाग असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. ही घटना उत्स्फूर्त होती. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत, असे या आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. 

सरकारचा दबाव नाही 
सरकारच्या दबावामुळे पत्रकाराला अटक झाल्याच्या चर्चेत तथ्य नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. संबंधित बातमीमुळे तेथील परिस्थिती चिघळल्याचा आरोप असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. या घटनेनंतर कोणालाही निलंबित करण्यात आले नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

Pune Traffic News : पुणेकरांनो सावधान! वाहतूक पोलिसांचा बडगा; ३ वर्षांत ४२ लाख वाहनचालकांवर कारवाईचा 'रेकॉर्ड'

Rajgad Illegal Hunting : राजगड तालुक्यात चौशिंग्या हरिण शिकार प्रकरणी वनविभागाकडून चार जणांना अटक; आरोपींकडून हत्यारे व मांस जप्त!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT