मुंबई

सीएसएमटी ते दिल्ली Rajdhani Express दररोज धावणार; प्रवाशांना दिलासा

कुलदीप घायवट

मुंबई  : मध्य रेल्वे ( Indian Railway ) मार्गावरील सीएसएमटी ते दिल्ली येथे जाणारी राजधानी एक्‍स्प्रेस 19 जानेवारीपासून दररोज धावणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली मध्य रेल्वेची राजधानी एक्‍स्प्रेस 30 डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे; मात्र मध्य रेल्वेची  ( central railway )राजधानी एक्‍स्प्रेस आठवड्यातून फक्त चार दिवस धावत आहे. "राजधानी'ला प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि मागणीनुसार मध्य रेल्वेकडून राजधानी विशेष गाडी 19 जानेवारीपासून दररोज सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राजधानी एक्‍स्प्रेस दररोज दुपारी 4 वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सुटणार असल्याची माहिती मध्य रेल्वने दिली आहे.

गाडी क्रमांक 01221 सीएसएमटीहून दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दुपारी 4.10 वाजता सुटते. ही एक्‍सप्रेस सायंकाळी 6.45 वाजता नाशिक रोडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.55 ला दिल्लीला पोहोचते. गाडी क्रमांक 01222 दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी दिल्लीहून दुपारी 4.55 ला रवाना होते. ही गाडी सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी 11.50 ला पोहोचते.

CSMT to Delhi Rajdhani Express will run daily

-------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT