decision of vanchit prakash ambedkar fight independently is right says Union Minister Ramdas Athawale Sakal
मुंबई

Dombivli : वंचितचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्यच; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आपले उमेदवार उभे केले. प्रकाश आंबेडकर यांनी हा योग्य निर्णय घेतला. त्याची इच्छा महाविकास आघाडीत सामिल व्हायची होती. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली- वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आपले उमेदवार उभे केले. प्रकाश आंबेडकर यांनी हा योग्य निर्णय घेतला. त्याची इच्छा महाविकास आघाडीत सामिल व्हायची होती. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

त्यामुळे स्वबळावर लढण्याचा जो निर्णय आहॆ तो योग्यच आहॆ, दुसरा इलाज अजिबात नाही. महाविकास आघाडीला लुटा लूट करता आली नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला टोला देखील लगावला आहे.

डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यानी पत्रकाराशी संवाद साधताना वंचितचा जो निर्णय आहे तो योग्य निर्णय आहे असे सांगितले.

वंचित ने मल्लिकार्जुन यांना पत्र लिहिलं होतं, त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यांनी त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा योग्य निर्णय आहे.

महाविकास आघाडीला लुटालूट करता आली नाही तर ते काय महाविकास करणार आहेत. दहा वर्षांमध्ये आपल्याला जो बदल आहे तो जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी बदल आपल्याला पाहायला मिळत आहे.त्यामुळे देशासमोर दुसरा पर्याय नाही मोदी हेच एकमेव पर्याय आहेत असे ते म्हणाले.

आठवले यांनी कविते पासून सुरवात केली...

"माझ्या नावामध्ये जरी असला राम तरी माझ आहे बौद्ध धर्माच काम" असे कविता म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात केली. ते म्हणाले, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. सर्वधर्मसमभावाची भूमिका आमची आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे चालवायची असेल तर अखंड भारताची भूमिका पुढे चालू ठेवली पाहिजे. या ठिकाणी दुसरी बौद्ध धम्म परिषद झालेली आहे बौद्ध धर्म हा मनाला शांततेच्या दृष्टीने नेणारा धर्म आहे. आगळी वेगळी परिषद आज येथे झाली आहे.

बच्चूकडू नाराजी...

बच्चूकडू आणि राणा दाम्पत्य यांचा वाद जुनाच आहॆ. त्याची नाराजी आणि विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिटवावा, मी त्यांच्याशी बोलेल, बच्चू कडू यांची नाराजी मिटवाण्याच्या प्रयत्न करेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT