मुंबई

शहरातील विकासकामांचा फटका ? लॉकडाऊननंतर पावसाने मुंबईकरांना रडवले 

सुमित बागुल

मुंबई  : लॉकडाऊननंतर पावसाने नागरीकांना चांगलंच रडवलंय. अनेक नागरिकांच्या   घरात पावसाचं पाणी शिरल्याने लहान मोठे दुकानदार, चाळीतील घरांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. मुंबईतील अनेक भागात दिवसभर संपुर्ण संसार पाण्यावर तरंगत होते. दक्षिण मुंबईतील पाणी न साचणाऱ्या गोल देऊळ, वरळी सी फेस, मुंबई सेंट्रल या भागातही पाणी साचले होते. वरळी सीफेस येथे कोस्टल रोडचे काम सुरु आहे. तर मुंबई सेंट्रल येथे मेट्रोचे काम सुरु आहे. नायर रुग्णालयातही पाणी साचले होते. महालक्ष्मी पंपिंग स्टेशनमुळे नाना चौक येथे पाणी साचण्याचे प्रमाणकमी झाले होते. मात्र, तेथेही आज पाणी साचले होते.

खरंतर मंगळवार रात्री पासून मुंबईत पावसाचा जाेर वाढला होता, मध्यरात्री पासून अनेक भागात पाणी साचू लागले. नंतर काल पहाटेपासून घरं आणि दुकानात पाणी साचल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले. कोविडच्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक कुटूंबाचे आर्थिक गणित विस्कटले आहे. त्यातच पावसामुळे अनेक संसार आज पाण्यावर अक्षरशा तरंगत होते. हिंदमाता, दादर टिटी या नेहमीच्या भागात पाणी साचले होते. त्याचबरोबर कुर्लाा क्रांतीनगर, शिव, बोरीवली, गोरेगाव, वांद्रे, मुलूंड तसेच अनेक भागात पाणी साचल्याने लाखोो घरांचे आणि लहान मोठ्या व्यापार्यांचे नुकसान झाले होते.

विज पुरवठा खंडीत 

पाणी साचल्याने मुंबईतील अनेक भागांमधील वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता. चिंचपोकळी येथे विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता असे स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी सांगितले. या परीसरात पावसाचे पाणी जास्त काळ साचून राहात नाही.  मात्र,काल परीस्थीती वेगळे होती. विजपुरवठा खंडीत असल्याने पिण्याचे पाणीही मिळण्यात अडचणी झाल्या होत्या.

मॅनहोल्स उघडल्याचा परीणाम 

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यावरील मॅनहोल्स उघडले जातात. मात्र, त्यामुळे रस्तावरील कचरा पंपिंगस्टेशनमध्ये अडकतो. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

due to future development plans mumbikar are facing water logging is question asked by citizens

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT