kalyan 
मुंबई

वाहतूक कोंडीमुळे कल्याणकर त्रस्त

रविंद्र खरात

कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस उपाय योजना करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. 

मध्य रेल्वेच्या कल्याण सहित कसारा आणि कर्जत रेल्वे स्थानक मधून प्रवासी संख्या वाढत असताना त्या शहरात लोकसंख्या वाढत असून मात्र मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

कल्याण शहरात नागरिक घराबाहेर पडले की रिक्षाचालकांची मुजोरी, रस्त्यांवरील वाहतुक कोंडी, रेल्वे स्थानकात रस्ता शोधावा लागतो बेशिस्त रेल्वे परिसरातील पार्किंग त्यातून निर्माण होणारी वाहतुक कोंडी, अनियमित रेल्वे सेवा, गर्दीतील प्रवास, नोकरीवर लेटमार्क, बढती पगारवाढ यावर परिणाम, सतत मानसिक तणाव व यातून ह्रदयविकार, रक्तदाब, प्रदुषणातील आजार ..अस्थिर मानसिक स्थितीने कुटुंबात चिडचिडपणातून कलह वाढतायेत. स्वास्थ्य हरपतेय ..वाढती महागाई, रस्त्यावरील असुरक्षित प्रवास, चालण्यास फुटपाथ रिकामे नाही, शहरात दुचाकी स्वार आणि रिक्षावाल्यांचा उच्छाद, रेल्वे प्रशासनाचा बेफिकिरपणा,

यामुळे नागरिक त्रस्त आहेत. केंद्र, राज्य सरकार, पालिका कर आणि रेल्वेच्या पास आणि तिकिटाचे पैसे देऊन ही गेली कित्येक महिने रेल्वे सेवा उशिरा धावतेय. गर्दी रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकात उसळत आहे. कामावर जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून प्रवासी रेल्वे प्रवास करत आहे. तर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे प्रदुषणात जीव घुसमटत आहे. सर्व सामान्यांच्या नशिबी मनस्ताप आहे. याबाबत लवकरात लवकर राज्य सरकारने रेल्वे, स्थानिक पालिका, वाहतूक पोलिस, आरटीओ, स्थानिक पोलिस अधिकारी वर्गाच्या बैठका घेऊन आम्हाला शहरात आणि लोकलमध्ये प्रवास करण्यात यावा यासाठी मदत करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. मुख्यमंत्री फडणवीस काय आदेश देतात याकडे लक्ष्य लागले आहे.

रविवार ता 10 फेब्रुवारी रोजी शहाड रेल्वे स्थानकामधील पादचारी पुलाच्या कामासाठी कल्याण ते कसारा मार्गावर मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवासी त्रस्त होते. सोमवार ता 11 फेब्रुवारी रोजी सकाळी पॉईंट फेल झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. मंगळवारी 12 फेब्रुवारी सकाळी सुद्धा 10 मिनिटे उशिरा लोकल धावत होती. तर शहरात वाहतूक कोंडी ने कल्याणकर त्रस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT