मुंबई

लोकल सुरु झाल्याने वसई विरारच्या महिला प्रवाशांमध्ये उत्साह; वेळेत बदल करण्याची मागणी

प्रसाद जोशी


वसई - लॉकडाऊन झाल्यापासून लोकल बंद होत्या त्यानंतर हळूहळू शिथिल केल्यावर एसटीने कामावर जाण्यासाठी 2 ते 3 तास खडतर प्रवास आणि त्यातून होणारी दमछाक महिलांसाठी तरी थांबली आहे,वसई विरारमध्ये जीवनवाहिनी सुरु झाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले असले तरी काही महिलांनी रेल्वेने वेळेत बदल करावा अशी मागणी केली आहे.

वसई विरार, नालासोपारा , नायगाव स्थानकातून रोज लाखो प्रवासी नोकरी, व्यवसायानिमित्त लोकलने प्रवास करतात.नेहमीच वर्दळ असणाऱ्या रेल्वे परिसरात लॉकडाऊन पासून शुकशुकाट होता. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावली परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी दारे उघडली न गेल्याने नाराजगी निर्माण होऊन लोकल सुरु करण्याची मागणी जोरात धरू लागली.

एसटीने मुंबईकडे जाण्यासाठी मर्यादित बसेस आणि प्रवाशांची संख्या जास्त असल्याने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एकीकडे कामावर जाण्यासाठी व पुन्हा परतीचा मार्ग धरताना तब्बल दोन ते तीन तासाचा प्रवास करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले.संसाराचा गाढा हाकतांना आर्थिक हातभार लावण्यासाठी महिला अनेक क्षेत्रात नोकरी करत आहेत परंतु धकाधकीच्या जीवनात कोरोनामुळे अनेक संकटे येऊन ठेपली त्यात नोकरीसाठी होणारी प्रवासाची चिंता सतावत असताना महिलांसाठी लोकल सुरु करण्यात आली असल्याने वसई विरारमधील महिलांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

महिलावर्गाने (ता. 21 ) सकाळी कामावर जाण्यासाठी रेल्वेकडे धाव घेतली.यावेळी वसई विरारमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कोरोनाचे नियम पाळा , रांगेत या अशा घोषणा रेल्वेकडून करण्यात येत होत्या.काही महिलांनी मात्र वेळेबाबत नाराजगी व्यक्त केली.कार्यालयाची आणि रेल्वेची वेळ यात तफावत असल्याने त्यात बदल करावा अशी मागणी केली जात आहे नवरात्री दरम्यान सरकारने भेट देऊन प्रवास सुखाचा आणि कमी वेळेत होणार असल्याचे देखील म्हणणे काही महिलांनी मांडले.

रेल्वे सुरु नव्हती त्यामुळे एसटी किंवा खाजगी वाहनाने मुंबईकडे जावे लागत होते. पैसा आणि वेळ अधिक लागत होता त्यात देखील मर्यादित प्रवासी असल्याने लांबच्या लांब रांगा लागत असल्याने घरातून 1 तास आगोदर बससाठी यावे लागत होते.रेल्वे सुरु झाल्याने दिलासा मिळाला आहे.
साधना मेजारी  -
महिला प्रवासी , विरार 

कार्यालय ज्यावेळी सुरु झाले तेव्हापासून लोकल बंदच होती.कामावर न गेल्यास नोकरी जाईल ही भीती असल्याने जे वाहन मिळेल त्यातून प्रवास केला.लोकल सुरु झाली याचा आनंद आहे मात्र कार्यालयाची वेळ पाहता रेल्वेने वेळापत्रकात बदल केला पाहिजे. सकाळी 7 पासून महिलांसाठी लोकल सुरु ठेवावी.
वनिता पांडे  -
महिला प्रवासी , वसई.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT