मुंबई

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार परीक्षा; उदय सामंताची महत्वपूर्ण माहिती, वाचा सविस्तर

तुषार सोनवणे

मुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासांची व 100 गुणांऐवजी 50 गुणांची घेण्यात येणार असल्याचे संकेत शुक्रवारी (ता.4) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मात्र या परीक्षा घेताना तंत्रज्ञानावर भर देत लेखी परीक्षांसाठी विद्यापीठाला एमसीक्यू, असाईमेंट किंवा ओपन बूकचे पर्याय खुले केले आहेत. तसेच प्रात्याक्षिक परीक्षा स्कायपे सारख्या मिटींग अ‍ॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी केल्या आहेत. परीक्षा पद्धती, वेळापत्रक व अभ्यासक्रम याबाबत तातडीने निर्णय घेऊन 7 सप्टेंबर पर्यंत सरकारकडे अहवाल सादर करावा, अशाही सूचना त्यांनी विद्यापीठाला दिल्या आहेत.

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने कुलगुरूंची समिती स्थापन केली होती. या समितीने शुक्रवारी राज्य सरकारला सादर केलेला अहवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. विद्यापीठांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी कमीतकमी कालावधीत परीक्षा घेताना त्या ऑनलाईन, ऑनलाईन व ऑफलाईन किंवा पेन व पेपर यांचा वापर करून घरातूनच परीक्षा घ्यावी, दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा 11 सूचना अहवालामध्ये समितीकडून मांडण्यात आल्या होत्या. यावर विद्यापीठाची शिक्षण समिती आणि परीक्षा मंडळाची तातडीने बैठक घेऊन परीक्षा कशा पद्धतीने घेता येतील, यावर चर्चा करून त्याची माहिती 7 सप्टेंबरपर्यंत सरकारला देत परीक्षेचे वेळापत्रक व अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावी, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देताना तंत्रज्ञानावर अधिकाधिक भर देत लेखी परीक्षांसाठी एमसीक्यू, असाईमेंट किंवा ओपन बूकचे पर्याय उपलब्ध करून देताना प्रात्याक्षिक परीक्षा स्कायपे सारख्या मिटींग अ‍ॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच ज्या विद्यार्थांना काही कारणांमुळे परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थांसाठी पुन्हा परीक्षा घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे विद्यापीठांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात अडचण असल्यास त्याची माहिती तातडीने सरकारला कळवावी, जेणेकरून परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात यूजीसीला कळवून मुदतवाढ घेण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT