कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले तब्बल १०० मोबाईल संच नागरिकांना परत दिले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे २९ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित मोबाईलचे क्रमांक एकत्रित केले आणि त्याआधारे शोधमोहीम राबवली. या मोहिमेमुळे हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात यश आले आणि ते त्यांच्या मालकांना परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून आला असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.