मुंबई

सरकारी कर्मचाऱ्यांना आता जेवणाची सुटी अर्धा तासच

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - भोजनाच्या नावाखाली टंगळमंगळ करणाऱ्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना यापुढे चाप बसणार आहे. जनतेची कामे खोळंबून राहता कामा नये, यासाठी सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी दुपारी एक ते दोन या वेळेत जेवणासाठी केवळ अर्धा तासाची सुटी घेतली जावी, असा बडगा सामान्य प्रशासन विभागाने उगारला आहे.

सरकारी, निमसरकारी कार्यालयांत कामकाजाच्या वेळेत दांड्या मारणाऱ्यांची संख्या कमी नाही. कामावर हजर राहूनही कार्यालयात अथवा कार्यालयाच्या बाहेर वेळकाढूपणा सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केला जात असल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याच्या अनेक तक्रारी सामान्य प्रशासन विभागाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने दुपारी एक ते दोन ही वेळ जेवणासाठी निश्‍चित केली आहे. यामध्येही जेवणासाठी केवळ अर्धा तास इतक्‍या वेळेची सवलत दिली जाणार आहे. या व्यतिरिक्‍त कोणत्याही कारणासाठी यापुढे अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी जेवणासाठी वेळ दिली जाणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT