मुंबई

उल्हासनगरमधील हवा घातक

दिनेश गोगी

उल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या अहवालामध्ये ठेवला आहे. मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील १७ शहरांवर प्रदूषणाबाबत ताशेरे ओढण्यात आले आले आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने देशातील १०२ शहरांची नॅशनल क्‍लीन एअर प्रोग्रामांतर्गत यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर या १७ शहरांवर प्रदूषणाबाबत ताशेरे ओढण्यात आले आहेत. या शहरांनी प्रदूषणावर मात करणारा विशेष कृती कार्यक्रम सादर केलेला नाही. विशेषतः या १७ शहरांपैकी उल्हासनगरसह बदलापूर आणि पुणे या तीन शहरांचे नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

उल्हासनगरात दोन डंपिंग ग्राऊंड असून त्याच्या धुरासोबत धूळ तसेच हवा प्रदूषण अधिक अाहे.  
-डी. बी. पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT