Mumbai High Court Sakal media
मुंबई

कोकणात अद्यापही स्वतंत्र नागरी संरक्षण दलाचे कार्यालय नाही - हायकोर्ट

सुनिता महामुनकर

मुंबई : वादळ आणि पावसाचा सतत (cyclone and heavy rainfall) फटका बसणाऱ्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी (konkan area) अद्यापही स्वतंत्र नागरी संरक्षण दलाचे कार्यालय (civil protection office) सुरू न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज राज्य सरकारवर (state government) तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या दोन आठवड्यात यावर निर्णय घेण्याचे निर्देष न्यायालयाने आज दिले आहेत.

मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरणी कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे आज निव्रुत्त महसूल कर्मचारी शरद राऊळ यांनी केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. या जिल्ह्यात नागरी संरक्षण दलाचे कार्यालय सुरू करण्यासाठी नागरी संरक्षण दलाने पाठविलेल्या पत्रांची दखलही अद्याप घेतली नाही. मागील पाच वर्षात यावर राज्य सरकारने निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न खंडपीठाने केला.

याचिकाकादारांच्या वतीने.अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी बाजू मांडली. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर हे सहा जिल्ह्यांना नैसर्गिक संकटाचा धोका अधिक आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण दलाचे केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या अधिकार्‍यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून अंतिम यादी मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी कार्यालयासाठीही जागाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र तरीही सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. मध्यतरी आलेली वादळे आणि पावसाळ्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती यामुळे नागरी संरक्षण दल अत्यावश्यक झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले. राज्य सरकारने दोन आठवड्यात यावर निर्णय घ्यावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Vehicle Rules: वाहन चालकांसाठी मोठा दिलासा! गाड्यांच्या सेफ्टी रडारसाठी आता लायसन्सची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय

KANE WILLIAMSON RETIRES: आता कोणाची फलंदाजी पाहायची? केन विलियम्सनच्या निवृत्तीने डोकं सून्न, क्रिकेटमधील एका 'सभ्य' युगाचा अंत!

Navi Mumbai: कोंडीमुक्त नवी मुंबईसाठी नवे धोरण लागू! बेशिस्त पार्किंगला चाप बसणार, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

Bal Sangopan Yojana: महाराष्ट्रातील अनाथ मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार, महायुती सरकारची नवी योजना; लाभ कसा घेता येणार?

महाडचा तो ऐतिहासिक लढा पुन्हा जिवंत होणार; माजी मंत्र्यांनी लिहिलेले 'हे' नाटक प्रेक्षकांच्या भेटीला!

SCROLL FOR NEXT