मुंबई

रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय लांबणीवर, MMRTAच्या पुढच्या बैठकीत निर्णय?

प्रशांत कांबळे

मुंबई: मुंबईकरांचा रिक्षा,टॅक्सी प्रवास ऐन कोरोना काळात वाढण्याची शक्यता काही दिवसांपासून व्यक्त केली जात होती. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षा, टॅक्सी संघटनांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत रिक्षा, टॅक्सी भाडे वाढीच्या प्रस्तावर चर्चाच झाली नसून पुढच्या बैठकीत या प्रस्तावाला मांडण्यात येणार असल्याचे परिवहन आयुक्त यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) च्या बैठकीत रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाढीवर निर्णय घेण्यात येणार होता. रिक्षाला 2 रुपये तर टॅक्सीला 3 रुपयाची भाडेवाढ देण्याच्या राज्य सरकार विचाराधीन होते. मात्र, टॅक्सी, रिक्षा संघटना मात्र या कोरोनाकाळात भाडेवाढीसाठी सकारात्मक नव्हती. भाडेवाढ आवश्यक असली तरी, ती आता देऊ नये, कोरोना काळ संपल्यावरच भाडेवाढीचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असे टॅक्सी रिक्षा संघटनांचे मत होते.

यासंदर्भात टॅक्सी मेन्स युनियनचे ए एल क्वाड्रोस, मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे शशांक राव यांनी निवेदन सुद्धा दिले होते. त्यानुसार एमएमआरटीएच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती दिली असून, यावर पुढच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येऊन त्यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे परिवहन आयुक्तांनी सांगितले आहे.

अधिकृत स्कूल बस थांबे उभारणार

मुंबई उपनगरातील स्कूल बस वाहनांसाठी अधिकृत थांबे उभारण्यासंदर्भात सुद्धा एमएमआरटीएच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यासाठी आता वाहतूक पोलिस विभाग आणि परिवहन विभाग मिळून अशा अधिकृत थांबे उभारणीबद्दल चर्चा करून, अधिकृत थांबे उभारण्यात येणार असल्याचे सुद्धा ढाकणे यांनी सांगितले आहे.

कोरोनाची लाट आता बऱ्याच प्रमाणात ओसरली आहे. त्यामुळे या बैठकीत जर मंगळवारी निर्णय घेतला असता तर अंमलबजावणी करण्यासाठी एक ते दोन महिने गेलेच असते. त्यामुळे आज निर्णय होणे अपेक्षित होता.
ए एल क्वाड्रोस, सरचिटणीस, टॅक्सी मेन्स युनियन

कोरोनाकाळात भाडेवाढ होऊ नये मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनची मागणीच होती. त्याशिवाय रिक्षा चालकांना सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे. सहा महिन्यांच्या कोविड काळात रिक्षा चालक मालकांना प्रति महिना 10 हजार रुपये दिले पाहिजे. रिक्षाला अद्याप अधिकृत परवानगी नाही. त्यातच आता रात्रीचा कर्फ्यू बंदी जाहीर झाल्याने रिक्षा चालवता येणार नाही. त्यामुळे भाडेवाढीने प्रश्न सुटणार नाही तर बिघडणार आहे. अशा काळात रिक्षा चालकांची कर्जमाफी द्यावी, त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे,आता लोकांनाही आर्थिक ताण आहे. अशात कुठे भाडेवाढ करता, गेल्या पाच वर्षात भाडेवाढ केली नाही, आता कोरोना काळात भाडेवाढ देऊन हात झटकण्याचे काम केले जात आहे. त्यांनी नागरिकांना आणि रिक्षा चालकांना वेठीस धरू नये
शशांक राव, अध्यक्ष मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियन

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

lockdown effect mumbai Taxi rickshaw fare hike decision hold

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

SCROLL FOR NEXT