मुंबई

"पगार वाढवा, नाहीतर नोकरी सोडतो.."; Air India च्या 120 वैमानिकांचे राजीनामे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या 120 वैमानिकांनी सामुहीक राजीनामे दिल्याची माहिती आहे. पगारवाढ आणि बढती न दिल्याच्या कारणावरून वैमानिकांनी राजिनाम्याचा हत्यार उपसलंय. सरकारच्या खासगीकरणाच्या निर्णयानंतर या विरोधाला सुरूवात झालीये.

गेल्या काही महिन्यांपासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी लाऊन धरली होती. पण, योग्य निर्णय न घेतल्याने हे राजिनाम्याचं हत्यार उपसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय.

" आम्हाला अपेक्षा होती, आमची पगारवाढ होईल. मात्र, असं झालेलं नाही. एअर इंडिया वैमानिकांना 5 वर्षांच्या कॉंट्रॅकवर घेते आणि कमी पगार देते. गेल्या काही काळापासून आम्ही कायमच पगारवाढीचा विषय लाऊन धरलाय. पण, याबाबत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. आमचं प्रमोशनही झालेलं नाहीये. एअर इंडिया मॅनेजमेंट याबाबतीत गंभीर नाही." असं, एका वैमानिकांनी ANI या वृत्त वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलंय.

दरम्यान, सामुहिक राजीनाम्यांमुळे एयर इंडियाला याचा काहीही फरक पडणार नसल्याचं एअर इंडियातील अधिकार्यांनी सांगितलंय. एयर इंडियाकडे अतिरिक्त वैमानिकांची कुमक आहे. एयर इंडियाकडे 2000 वैमानिक आहेत, त्यातील 400 हे एक्झीक्युटीव्ह आहेत. 

सध्या आमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे आम्हाला कुठेही नोक्ती मिळेल असा विश्वास या वैमानिकांना वाटतोय. 
  

WebTitle : marathi news air India mass resignation 120 pilots resigned from the post of pilots

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT