File photo of Ashok Chavan
File photo of Ashok Chavan 
मुंबई

कोरेगाव भीमा प्रकरण हे सरकारचे अपयश : काँग्रेस

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून, मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की कोरेगाव भीमा प्रकरण हे सरकारचे अपयश आहे अशीच सर्वांची भावना आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झाला आहे. सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर सरकार कारवाई का करीत नाही? त्यांना अटक का केली जात नाही? सरकारच्या मूकसंमतीने जाणीवपूर्वक हे सुरू आहे, असा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. दरम्यान, काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरे घेणार असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या काही सभा महाराष्ट्रात झाल्या पाहीजेत अशी नेत्यांची इच्छा आहे. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस राहुल गांधींना महाराष्ट्रात सभा घेण्याची विनंती करणार आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT