मुंबई

विजेची मागणी पावसामुळे घटली 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे विजेच्या मागणीत आजच्या दिवसात घट झाली; मात्र भारनियमन आजही काही ग्राहक श्रेणींच्या शहरांसाठी कायम ठेवण्यात आले होते.

आज दिवसभरात विजेची सरासरी मागणी 16501 मेगावॅट होती, तर विजेची उपलब्धतता 15701 मेगावॅट इतकी होती. 800 मेगावॅट तुटवड्यासाठी ई ते जी 3 या ग्राहक श्रेणीत भारनियमन करण्यात आले.

पावसामुळे विजेची मागणी 1500 मेगावॅटने कमी होण्यासाठी मदत झाली. त्यामुळे विजेचे भारनियमनाचे तासही कमी होण्यास मदत झाली. आजही कोळशाअभावी महानिर्मिती; तसेच खासगी कंपन्यांचे बरेचसे संच बंद होते. तर काही संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीसाठीची वीज खरेदी म्हणून महावितरणने 700 मेगावॅट वीज अल्पमुदतीच्या करारावर खरेदी केली आहे, तर आणखी 700 मेगावॅट वीज येत्या दोन दिवसांमध्ये पॉवर एक्‍सचेंजमधून उपलब्ध होण्याची आशा आहे. त्यामुळे भारनियमनाच्या तासांमध्ये घट होण्याची शक्‍यता महावितरणने वर्तवली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प राज्याच्या मदतीला पुन्हा एकदा धावून आला आहे. आज 1200 मेगावॅट वीज या प्रकल्पातून राज्यासाठी उपलब्ध झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT