Mumbai Accident
Mumbai Accident sakal
मुंबई

Mumbai Accident : कल्याणमध्ये कंटेनर आणि रिक्षांची जोरदार धडक दोन रिक्षाचालक जखमी; चालकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण येथील आई तिसाई देवी पूलाजवळ सकाळच्या वेळेस कंटेनर आणि दोन रिक्षांची धडक होत अपघात घडला. या अपघातात रिक्षांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दोघे रिक्षाचालक जखमी झाले आहेत. बिघाड झालेला कंटेनर बाजूला घेण्यात येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षांची त्याला धडक बसल्याने हा अपघात झाला.

या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कल्याण शीळ रस्त्यावरुन अवजड वाहनांना बंदी असतानाही बिनदिक्कत वाहतूक सुरु असते. काही दिवसांपूर्वीच आरटीओने अवजड वाहनांवर कारवाई केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र परिस्थिती आजही जैसे थे असून सोमवारी पहाटे अपघाताची घटना घडल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे.

कल्याण पश्चिमेतील आई तिसाई देवी उड्डाणपूलावर सोमवारी सकाळी कंटेनर आणि दोन रिक्षांची धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. दुर्गाडी दिशेकडून उड्डाणपूल मार्गे हा कंटेनर प्रवास करत असताना रात्री 2 ते 3 च्या सुमारास कंटेनरमध्ये बिघाड झाला. एअर व्हॉल्व मध्ये बिघाड झाल्याने गाडीचे ब्रेक देखील फेल झाले होते. या ठिकाणी मोठी वाहने उभी करण्यास जागा नसल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी कंटेनर चालकाला ट्रेलर बाजूला घेण्यास सांगितले.

कंटेनर यु टर्न मारुन बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान दोन रिक्षा भरधाव वेगाने येत असल्याने त्या सरळ कंटेनरवर जाऊन धडकल्या. यात रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. रिक्षाचालक अमजद शेख आणि अकबर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याच आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली. तर किरकोळ जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

कल्याण शीळ रोड मार्गे अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक ही सुरु असते. आरटीओ, वाहतूक पोलिस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मध्यंतरी कल्याण शीळ रोड मार्गे अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याची पाहणी करत वाहतूक पोलिसांना जाब विचारला होता.

त्यानंतर अवजड वाहनांवर कारवाई होत असल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. परंतू आजही या मार्गावर अवजड वाहनांची वाहतुक सुरु असल्याचे दिसून येते. सोमवारी पहाटे झालेला हा अपघात याचे उदाहरण आहे.

हा अपघात घडल्यानंतर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा ट्विट करत आरटीओ, वाहतूक पोलिसांचे याकडे लक्ष वेधू केले आहे. आमदार पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये ''अवजड वाहनांना कल्याण शीळ मार्गावर प्रतिबंध असतानाही चिरीमीरी घेऊन सर्रास प्रवेश दिला जात आहे. वाहतूकीचे नियमन करण्यासाठी नेमलेल्या वॉर्डनच्या माध्यमातून वसूली केली जात आहे. आज सकाळी पत्रीपूल येथे अश्याच एका अवजड वाहनाने दोन रिक्षांना धडक मारली. आता तरी प्रशासनाने लक्ष द्यावे...'' असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umar Khalid Rejects Bail: उमर खालिद मोठा झटका! कोर्टानं पुन्हा फेटाळला जामीन अर्ज

IPL 2024: KKR च्या विजयानंतर रिंकु सिंगचा ऋषभ पंतला Video कॉल, पाहा काय झालं दोघांमध्ये संभाषण

Pune Porsche Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याच्या आरोपात अटक; कुटुंबीय म्हणतात, 'अजय तावरेंचा या प्रकरणाशी आणि ललित पाटीलशी...'

Women Health: रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्‍ये एएससीव्‍हीडीचा धोका वाढतो; जाणून घ्या तज्ञांचे मत

Malaika Arora: मलायकाच्या 'त्या' कृत्याचं होतंय कौतुक; व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT