मुंबई

गोविंदांच्या सुरक्षेसाठी 350 गिर्यारोहक

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मनोरा कोसळल्यावर गोविंदांना इजा होऊ नये यासाठी गिर्यारोहकांची मदत घेतली जाणार आहे. रत्नाकर कपिलेश्‍वर यांनी "बिले' पद्धतीने गोविंदांचे संरक्षण करण्यासाठी तब्बल 350 गिर्यारोहकांचे पथक तयार करण्याचे ठरवले आहे.

दोन-तीन वर्षांपासून या पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याला चांगले यश मिळत आहे. यंदा ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जावी, यासाठी दहीहंडी समन्वय समिती कपिलेश्‍वर यांची मदत घेत आहे. कपिलेश्‍वर यांनी "बिले' पद्धतीविषयी सीडी तयार केली आहे. अनेक आयोजकांना त्यांनी ती पाठवली आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा उतरवण्याबरोबरच त्यांना इजा होऊ नये यासाठी समन्वय समिती प्रयत्न करत आहे. प्रत्येक मोठ्या दहीहंडीच्या ठिकाणी दोन गिर्यारोहक गोविंदांच्या मदतीला असतील.

अशी आहे "बिले' पद्धत
वरच्या थरांतील गोविंदांना "बिले' पद्धतीचा आधार दिला जाईल. हंडीच्या आडव्या दोराला मनोरा रचण्याच्या ठिकाणी काही दोऱ्या बांधून खाली सोडल्या जातात. मनोरा कोसळल्यावर वरच्या थरातील गोविंदा या दोऱ्या पकडून लोंबकळत राहतात. नंतर त्यांना सुरक्षितपणे उतरवले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT