भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडे sakal
मुंबई

Mumbai : प्रादेशिक पक्षांमुळे भाषिक भेद ! भालचंद्र नेमाडे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाषेला कधीही सीमा आणि मर्यादा नव्हत्या. मराठी, हिंदी, गुजराती या भाषेत काही फार मोठे फरक नाहीत; परंतु प्रादेशिक पक्षांमुळे भाषिक भेद बरेच वाढले. आपणही हा भेद अधिक करत सुटलो; मात्र भाषिक पातळीवर निर्माण झालेली दरी राजकमल प्रकाशनाच्या किताब महोत्सवातून दूर केली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी केले. राजकमल प्रकाशनच्या किताब उत्सवाच्या उद्‍घाटन सत्रात ते बोलत होते.

हिंदी पुस्तकविश्वात प्रसिद्ध असलेल्या राजकमल प्रकाशनच्या ‘राजकमल किताब उत्सवा’ला आजपासून वरळी येथे सुरुवात झाली. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, हिंदी साहित्यिक अब्दुल्ल बिस्मिल्लाह, राजकमल प्रकाशनचे अशोक महेश्वरी आदी उपस्थित होते. राजकमल प्रकाशनने नुकतेच ७६ वर्षांत पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर मुंबईत किताब उत्सव आयोजित करण्यात आला. यापूर्वी अलाहाबाद, वाराणसी, पाटणा, चंडीगड येथे किताब उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे महेश्वरी यांनी प्रास्ताविकेत सांगितले.

नेमाडे म्हणाले, दक्षिणेत प्रसिद्ध झालेले सांबार हे मूळ मराठीच होते. ते आज जगभरात गेले. त्यामुळे पूर्वी भाषेला काहीही मर्यादा नव्हती; परंतु हल्ली आपण पायाभूत चर्चा विसरलो आणि भाषिक भेद करत बसलो. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांमुळे देशातील विविध भाषेंमधील दरी वाढली; मात्र राजकमल प्रकाशनसारख्या संस्थेने विविध भाषांमधील साहित्यिक आस्वाद वाचकांपुढे किताब उत्सवाच्या माध्यमातून आला.

पुस्तकात चांगले काही नसेल, तर लोक टाकून देतात आणि चांगले पुस्तक राखून ठेवले जाते. पुस्तकामध्ये केवळ लेखकाचीच नव्हे, तर प्रकाशक, मुखपृष्ठकार, मुद्रितशोधक, वाचक आदी अनेकांची महत्त्वाची भूमिका असते. पुस्तक लिहिताना माझ्याजवळ आई-वडिलांची पुण्याई होती. त्याचा प्रभाव त्यावर पडला; मात्र पुस्तके लिहिणे, ती वाढवणे ही सर्वात मोठी समाजसेवा असल्याचे नेमाडे म्हणाले.

राजकमल प्रकाशनने ‘उचल्या’ हे पुस्तक ‘उचक्का’ म्हणून हिंदीत आणून मला देशभरात ओळख दिली. आमच्या जगण्यातील वास्तव जगभरात पोचवले. आम्ही आजही स्वतंत्र नाही म्हणून आम्हाला गावात येऊ दिले जात नाही. त्याची ओळख राजकमल प्रकाशनने मला करून दिली. सामाजिक विषयाला स्पर्श करून त्या साहित्यिकाला न्याय देऊन नवीन भारत जोडण्याचे काम केले.

- लक्ष्मण गायकवाड, लेखक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT